शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पारा ४१.१ अंश : उन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:33 IST

गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे.

ठळक मुद्देहंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान सकाळी आठ वाजेपासून उन्हाच्या झळा असह्य वाटू लागल्या हंगामात पहिल्यांदाच कमाल तपमान ४१ अंशापर्यंत किमान तपमान गुरूवारी २४.२

नाशिक : शहरात उष्णतेचा वाढता कहरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढणारे कमाल तपमान गुरूवारी (दि.१०) थेट ४१.१ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककर दिवसभर उन्हाच्या चटक्याने भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे.गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. सकाळी आठ वाजेपासून उन्हाच्या झळा नाशिककरांना असह्य वाटू लागल्या होत्या. कारण हवेचा वेग पहाटेपासूनच मंदावलेला होता. परिणामी सुर्यकिरणांची प्रखरता अधिक वाढली आणि त्यामुळे दिवसभर नाशिककरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. हंगामात पहिल्यांदाच कमाल तपमान ४१ अंशापर्यंत पोहचल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दुपारपर्यंत शहरात वाऱ्याचा वेग पुर्णता मंदावलेला होता; मात्र चार वाजेनंतर काहीसा वारा सुरू झाला परंतू त्याचाही फारसा उपयोग वातावरणाला झाला नाही. कारण दुपारनंतर निरभ्र आकाशात काही प्रमाणात ढग दाटण्यास सुरूवात झाली होती. एकूणच अशा विचित्र वातावरणामुळे शहराचे किमान तपमान गुरूवारी २४.२ इतके नोंदविले गेले. किमान तपमान २४ अंशापर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूणच नाशिककरांना यामुळे रात्रीही उकाडा अनुभवयास आला.

दिवसभर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना रात्री उकाड्याने त्रस्त केले. कारण ढगाळ हवामानामुळे वातावरण फारसे थंड होऊ शकले नाही. सुर्यास्तानंतरही वातावरणात ऊबदारपणा जाणवत होता. रात्रीदेखील वाºयाचा वेग तसा कमीच राहिला. एकूणच उष्णतेचा कहर सध्या सुर्याकडून सुरू आहे. मागील वर्षी १२ मे रोजी कमाल तपमान ४१.२ इतके नोंदविले गेले होते. यावर्षी दोन दिवस अगोदरच कमाल तपमानाचा पारा ४१ अंशावर पोहचल्याने पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणाची स्थितीत बदल न झाल्यास तपमान ४१.५ किंवा ४१.८ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उन्हाचा सलग तडाखानाशिककरांना यावर्षी सलग दोन महिन्यांपासून उन्हाचा तीव्र तडाखा सहन करावा लागत आहे. एप्रिलअखेरपर्यंत उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात जाणवत होती. २७ एप्रिल रोजी ४०.५ इतके उच्चांकी तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मे महिना उजाडताच सुरूवातीचे काही दिवस वारा अधिक चांगला राहिल्यामुळे तपमानाचा पारा कमी होता; मात्र मे च्या दहाव्या दिवशी उच्चांक विक्रमी ४१ अंशापर्यंत तपमान पोहचल्याने नाशिककर भाजून निघाले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानNashikनाशिकweatherहवामान