शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पारा ४१.१ अंश : उन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:33 IST

गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे.

ठळक मुद्देहंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान सकाळी आठ वाजेपासून उन्हाच्या झळा असह्य वाटू लागल्या हंगामात पहिल्यांदाच कमाल तपमान ४१ अंशापर्यंत किमान तपमान गुरूवारी २४.२

नाशिक : शहरात उष्णतेचा वाढता कहरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढणारे कमाल तपमान गुरूवारी (दि.१०) थेट ४१.१ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककर दिवसभर उन्हाच्या चटक्याने भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे.गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. सकाळी आठ वाजेपासून उन्हाच्या झळा नाशिककरांना असह्य वाटू लागल्या होत्या. कारण हवेचा वेग पहाटेपासूनच मंदावलेला होता. परिणामी सुर्यकिरणांची प्रखरता अधिक वाढली आणि त्यामुळे दिवसभर नाशिककरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. हंगामात पहिल्यांदाच कमाल तपमान ४१ अंशापर्यंत पोहचल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दुपारपर्यंत शहरात वाऱ्याचा वेग पुर्णता मंदावलेला होता; मात्र चार वाजेनंतर काहीसा वारा सुरू झाला परंतू त्याचाही फारसा उपयोग वातावरणाला झाला नाही. कारण दुपारनंतर निरभ्र आकाशात काही प्रमाणात ढग दाटण्यास सुरूवात झाली होती. एकूणच अशा विचित्र वातावरणामुळे शहराचे किमान तपमान गुरूवारी २४.२ इतके नोंदविले गेले. किमान तपमान २४ अंशापर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूणच नाशिककरांना यामुळे रात्रीही उकाडा अनुभवयास आला.

दिवसभर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना रात्री उकाड्याने त्रस्त केले. कारण ढगाळ हवामानामुळे वातावरण फारसे थंड होऊ शकले नाही. सुर्यास्तानंतरही वातावरणात ऊबदारपणा जाणवत होता. रात्रीदेखील वाºयाचा वेग तसा कमीच राहिला. एकूणच उष्णतेचा कहर सध्या सुर्याकडून सुरू आहे. मागील वर्षी १२ मे रोजी कमाल तपमान ४१.२ इतके नोंदविले गेले होते. यावर्षी दोन दिवस अगोदरच कमाल तपमानाचा पारा ४१ अंशावर पोहचल्याने पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणाची स्थितीत बदल न झाल्यास तपमान ४१.५ किंवा ४१.८ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उन्हाचा सलग तडाखानाशिककरांना यावर्षी सलग दोन महिन्यांपासून उन्हाचा तीव्र तडाखा सहन करावा लागत आहे. एप्रिलअखेरपर्यंत उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात जाणवत होती. २७ एप्रिल रोजी ४०.५ इतके उच्चांकी तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मे महिना उजाडताच सुरूवातीचे काही दिवस वारा अधिक चांगला राहिल्यामुळे तपमानाचा पारा कमी होता; मात्र मे च्या दहाव्या दिवशी उच्चांक विक्रमी ४१ अंशापर्यंत तपमान पोहचल्याने नाशिककर भाजून निघाले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानNashikनाशिकweatherहवामान