शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला संमेलन मिळाल्यास यशस्वी करण्याचा सभेत केला निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:36 IST

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी  लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सर्व सभासदांनी व्यक्त केला. 

नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी  लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सर्व सभासदांनी व्यक्त केला. लोकहितवादी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी कुसुमाग्रज स्मारकात पार पडली. १० वाजता गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आलेल्या सभेला १०.३० वाजता प्रारंभ झाला. यावेळी इतिवृत्त मंजुरीसह विषयपत्रिकेवरील २०-२१च्या अंदाजपत्रकाचा विषय वगळता अन्य सर्व विषयांना मंजुरी  मिळाली. यावेळी बोलताना अध्यक्ष जातेगावकर यांनी राज्य साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव दिलेला असून,  महामंडळाची समिती ७ जानेवारीला स्थळपाहणी करण्यास येणार  असल्याचे सांगितले. त्या समितीच्या स्थळपाहणीनंतरच्या आठवडाभरात साहित्य संमेलन नाशिकला होणार की नाही, ते निश्चित होणार आहे, तसेच महामंडळाला हे थोड्या नियंत्रित स्वरूपातील संमेलन मार्चअखेरपर्यंतच घ्यायचे असल्याने निर्णयानंतरच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. मात्र, प्रस्ताव जरी लोकहितवादी मंडळाने दिला असला, तरी हे संमेलन नाशिककरांचे असेल. त्यामुळे संमेलन यशस्वी झाले तरी नाशिकचे नाव होणार असून, त्रुटी राहिल्या, तरी गावाच्या नावावर जाणार असल्याने, सर्व नाशिककरांनी मिळून संमेलन यशस्वी करण्याचा  निर्धार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले, तसेच लोकहितवादी मंडळाचे ज्योतीकलश सभागृह हे मनपाने ताब्यात घेतलेले असले, तरी त्याबाबत संस्थेचे विश्वस्त आणि माजी आमदार हेमंत टकले हे आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले. विषयपत्रिकेचे वाचन सुभाष पाटील यांनी केले.  किरण समेळ यांनी अंदाजपत्रक मांडले. मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ऐन वेळच्या विषयात श्रीकांत बेणी यांनी ज्योतीकलश सभागृह पुन्हा मंडळाला मिळावे, यासाठी काय प्रयास झाले, त्याबाबतची माहिती द्यावी, असे सांगितले, तसेच संमेलन नाशिकला झाल्यास त्यातून मंडळालाही आर्थिक बळ मिळू शकेल, असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर सुभाष पाटील, दिलीप साळवेकर, भगवान हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अंदाजपत्रकासाठी बोलावणार विशेष सभा यंदाच्या वर्षीचे साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित होण्यास आठवडाभराहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे संमेलन नाशिकला मिळाल्यास त्याबाबतच्या प्रस्तावित खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे आताच्या सभेत यंदाच्या २०-२१च्या अंदाजपत्रकाच्या मंजुरीचे काम पुढे ढकलण्यात आले, तसेच आवश्यकतेनुसार पुढील पंधरवड्यात त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णयही अध्यक्षांनी जाहीर केला. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक