शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

नाशिकला संमेलन मिळाल्यास यशस्वी करण्याचा सभेत केला निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:36 IST

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी  लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सर्व सभासदांनी व्यक्त केला. 

नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी  लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सर्व सभासदांनी व्यक्त केला. लोकहितवादी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी कुसुमाग्रज स्मारकात पार पडली. १० वाजता गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आलेल्या सभेला १०.३० वाजता प्रारंभ झाला. यावेळी इतिवृत्त मंजुरीसह विषयपत्रिकेवरील २०-२१च्या अंदाजपत्रकाचा विषय वगळता अन्य सर्व विषयांना मंजुरी  मिळाली. यावेळी बोलताना अध्यक्ष जातेगावकर यांनी राज्य साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव दिलेला असून,  महामंडळाची समिती ७ जानेवारीला स्थळपाहणी करण्यास येणार  असल्याचे सांगितले. त्या समितीच्या स्थळपाहणीनंतरच्या आठवडाभरात साहित्य संमेलन नाशिकला होणार की नाही, ते निश्चित होणार आहे, तसेच महामंडळाला हे थोड्या नियंत्रित स्वरूपातील संमेलन मार्चअखेरपर्यंतच घ्यायचे असल्याने निर्णयानंतरच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. मात्र, प्रस्ताव जरी लोकहितवादी मंडळाने दिला असला, तरी हे संमेलन नाशिककरांचे असेल. त्यामुळे संमेलन यशस्वी झाले तरी नाशिकचे नाव होणार असून, त्रुटी राहिल्या, तरी गावाच्या नावावर जाणार असल्याने, सर्व नाशिककरांनी मिळून संमेलन यशस्वी करण्याचा  निर्धार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले, तसेच लोकहितवादी मंडळाचे ज्योतीकलश सभागृह हे मनपाने ताब्यात घेतलेले असले, तरी त्याबाबत संस्थेचे विश्वस्त आणि माजी आमदार हेमंत टकले हे आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले. विषयपत्रिकेचे वाचन सुभाष पाटील यांनी केले.  किरण समेळ यांनी अंदाजपत्रक मांडले. मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ऐन वेळच्या विषयात श्रीकांत बेणी यांनी ज्योतीकलश सभागृह पुन्हा मंडळाला मिळावे, यासाठी काय प्रयास झाले, त्याबाबतची माहिती द्यावी, असे सांगितले, तसेच संमेलन नाशिकला झाल्यास त्यातून मंडळालाही आर्थिक बळ मिळू शकेल, असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर सुभाष पाटील, दिलीप साळवेकर, भगवान हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अंदाजपत्रकासाठी बोलावणार विशेष सभा यंदाच्या वर्षीचे साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित होण्यास आठवडाभराहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे संमेलन नाशिकला मिळाल्यास त्याबाबतच्या प्रस्तावित खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे आताच्या सभेत यंदाच्या २०-२१च्या अंदाजपत्रकाच्या मंजुरीचे काम पुढे ढकलण्यात आले, तसेच आवश्यकतेनुसार पुढील पंधरवड्यात त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णयही अध्यक्षांनी जाहीर केला. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक