शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जीवनातील पैलूंचे नैपुण्य जपावे : अरुण करमरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:16 AM

मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू नैपुण्यपूर्ण असल्याने समाज जीवनाच्या प्रगतीत प्रत्येक घटकाचा सहभाग असू शकतो. त्यामुळेच मानवी जीवनातील विविध पैलुंमधील नैपुण्य जपले पाहिजे, असा संदेश भारतीय समाज जीवनाच्या दर्शनातून घडत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले.

नाशिक : मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू नैपुण्यपूर्ण असल्याने समाज जीवनाच्या प्रगतीत प्रत्येक घटकाचा सहभाग असू शकतो. त्यामुळेच मानवी जीवनातील विविध पैलुंमधील नैपुण्य जपले पाहिजे, असा संदेश भारतीय समाज जीवनाच्या दर्शनातून घडत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले.नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. मुंजे सभागृहात शनिवारी (दि.२४) संस्थेचा वार्षिक गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी व कार्यवाह हेमंत देशपांडे उपस्थित होते. अरुण करमरकर म्हणाले, भारताने १९७४ नंतर दुसरी अणुचाचणी पोखरणच्या वाळवंटात केली. या अणुचाचणीच्या निमित्ताने १९९८ पर्यंत म्हणजेच जवळपास २४ वर्षे भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या उपलब्धीसाठी पडद्याआड राहून वाट पाहिली. हाच आदर्श समोर ठेवून सर्वांनी शिक्षणाचा मूळ उद्देश समजून घेत सकारत्मक अर्थाने शिक्षणात आपले योगदान नेमके काय असू शकते याचा विचाक करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रारंभी डॉ. बा. शि. मुंजे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यातआल्यानंतर दीपप्रज्वलानाने गुणगौरव सोहळ्यास सुरुवात झाली. सावनी कुलकर्णी यांच्या ‘वंदे मातरम’ गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथी अरुण करमरकर यांचा परिचय करून दिला.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसंस्थेच्या विविध विभागांतून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विभागात नैपुण्य मिळवणाऱ्या तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि विद्यादानाच्या कार्यात सतत कार्यरत असतानाही पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या गुणवंत शिक्षकांसोबतच नाशिकमध्ये उद््भवलेल्या महापुरात जिवाची पर्वा न करता बचाव कार्य करणाºया शिक्षकांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सर्व शाळांतून प्रथम तीन क्रमांकांच्या शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्काराने गौरवण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक