शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एकलहरेत घास पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:13 AM

परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात.

एकलहरे : परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात. परिसरातील अनेक शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे गायी, म्हशी, शेळ्या दुग्धव्यवसायासाठी पालन केलेल्या आहेत. या दुधाळ जनावरांसाठी बारमाही खाद्य म्हणून घास पिकाची लागवड केली जाते.उसाची कुट्टी, कडबा, मका, हिरवे गवत हे खाद्य त्या- त्या सिझनमध्ये मिळते. मात्र घास हा बाराही महिने दुधाळ जनावरांसाठी मिळू शकतो. एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे परिसरातील बहुतेक शेतकरी मोठ्या प्रमाणात घासची लागवड करून घरच्या जनावरांसाठी वैरण म्हणून वापरतात. परंतु काही शेतकरी याचा व्यापारही करतात. व्यापारी वापरासाठी दोन-चार बिघे घास पेरून तो कापून व्यापाऱ्यांना विकला जातो. व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा घास बांधावरच विकत घेऊन तो बाजारामध्ये नेतात. मोठमोठ्या गोठे, तबेलेवाल्यांना व्यापारी घासचा पुरवठा करतात. नाशिक शहरालगत म्हशींचे अनेक गोठे आहेत. या गोठेवाल्यांना नियमित घास पुरवठा करणारे काही व्यापारी आहेत. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात घेतलेल्या घासच्या प्रत्येक पेंढीमागे दोन-तीन रुपये जरी मिळाले तरी वाहतूक खर्च वजा जाता व्यापाºयांना चांगला नफा मिळतो व शेतकºयांनाही रोख पैसा मिळतो.घासची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी घरीच तयार केलेले गावठी बी वापरतात. ७०० ते ८०० रुपये किलोने हे बी विकतही मिळते. बिघाभर घासची लागवड करण्यासाठी साधारण १० ते १२ किलो बी लागते. तत्पूर्वी ३ ते ४ ट्रॅक्टर शेणखत पसरून ४ फूट रुं दीचे वावरभर लांब मोठमोठे वाफे तयार करून लागवड केली जाते. पाणी भरल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी लहान घासची पहिली कापणी केली जाते. काही शेतकरी उंदीर लागू नये म्हणून एका आड एक वाफे कापतात. तर व्यापाºयाला विकण्यासाठी सरसकट कापणी केली जाते. एका वाफ्यात साधारण ५० पेढ्या घास निघतो. एक वाफा कापण्यासाठी ९० रु पये मजुरी दिली जाते. घास कापून, त्याच्या पेंंढ्या बांधून ठोक पद्धतीने १०ते १२ रुपये पेंढीप्रमाणे व्यापाºयाला बांधावरच विकला जातो. मार्च ते जून या चार महिन्यांत घासाला चांगला भाव मिळतो. एकदा लागवड करून खत पाणी वेळेवर दिले की नंतर फारशी मशागत करावी लागत नाही.कमी खर्चात उत्पन्नएकदा कापणी झाल्यावर पुन्हा २१ ते २५ दिवसांनी पूर्ण वाढ झाल्याने पुन्हा कापणी करावी लागते. कापणीची मजुरी व पेंढी बांधने या व्यतिरिक्त फारसा खर्च येत नसतो. एकदा लावलेला घास दोन ते तीन वर्षे पुरतो. त्यामुळे दर २५ दिवसांच्या अंतराने खर्च वजा जाता बिघाभर घासचे ८ ते १० हजार रु पये शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकºयाचा घरखर्च, विजेचे बील, पेट्रोलपाणी, मुलांची शाळेची शुल्क खर्च भागविला जातो. त्यामुळे इतर नगदी पिकांबरोबरच घासचे पीक उपयुक्त ठरते, असे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती