शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मनाम्हम सब साथ साथ है.. :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 9:35 PM

नाशिक : जगभर उठलेली कोरोना विषाणूची टोळधाड, मृत्यूने घातलेले थैमान आणि रोज संशयित-बाधितांचा सुरू असलेला लपंडाव यामुळे निर्माण झालेला नकारात्मक भाव नष्ट व्हावा व एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन आशेचे दीप मनामनात प्रज्वलित व्हावे, याकरिता रविवारी (दि. ५) रात्री ९ वाजेनंतर ९ मिनिटे अनोखा दीपोत्सव घराघरात साजरा झाला. सोशल डिस्टन्स ठेवून सोशल कनेक्ट करणारा, सर्वांचे मनोबल उंचावणाऱ्या या दीपोत्सवाने कोरोनाविरु द्धच्या लढाईत ‘हम सब साथ साथ है’ हा विश्वास अधिक दृढ केला.

ठळक मुद्देकोरोनामुक्तीच्या लढाईत उजळून निघाला निर्धारानात पेटले आशेचे दीप !

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जगभर उठलेली कोरोना विषाणूची टोळधाड, मृत्यूने घातलेले थैमान आणि रोज संशयित-बाधितांचा सुरू असलेला लपंडाव यामुळे निर्माण झालेला नकारात्मक भाव नष्ट व्हावा व एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन आशेचे दीप मनामनात प्रज्वलित व्हावे, याकरिता रविवारी (दि. ५) रात्री ९ वाजेनंतर ९ मिनिटे अनोखा दीपोत्सव घराघरात साजरा झाला. सोशल डिस्टन्स ठेवून सोशल कनेक्ट करणारा, सर्वांचे मनोबल उंचावणाऱ्या या दीपोत्सवाने कोरोनाविरु द्धच्या लढाईत ‘हम सब साथ साथ है’ हा विश्वास अधिक दृढ केला.भारतातही कोरोनाविरुद्धची लढाई तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम भारतीयांचे मनोबल उंचावण्यासाठी आधी २२ मार्चला जनता कर्फ्यूनंतर लोकांना थाळीनाद आणि टाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते. त्याला देशभर उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लॉकडाउनची घोषणा झाली होती. आता लॉकडाउनचा १२ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर लोकांमध्ये कोरोनाविषयी असलेला भीतीचा प्रकोप दूर व्हावा आणि त्यांनी कोरोना विरु द्धच्या लढाईत सरकारी प्रयत्नाना धैर्याने साथ द्यावी यासाठी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लोकांना आपापल्या गॅलरीत, घराच्या उंबºयावर दिवे पेटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर व जिल्ह्यात हा अनोखा दीपोत्सव नागरिकांनी अनुभवला. कोरोनाच्या भयाची किनार लाभलेल्या या दीपोत्सवाने मनामनात ही लढाई जिंकण्याची ऊर्जा दिली. थाळी आणि टाळी वादनाप्रमाणेच लोकांनी आपल्या घरातील बाल्कनीत, गच्चीवर, उंबरºयावर हाती पणत्या, मेणबत्त्या पेटवत जगण्याच्या लढाईत स्वबळ आणखी वाढवले. लोकांनी ही लढाई लाईटली न घेता रात्री ९ वाजता घरातील विजेचे दिवे मालवले आणि तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाचा उत्सव साजरा केला.या लढाईत आपण एकटे नाही तर सर्व देश माझ्या सोबत आहे, हा एक दृढ भावही यामुळे लोकांमध्ये घट्टपणे रु जला.मालेगावकरांनी घराघरात लावले दिवे मालेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरातील नागरिकांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुमारे नऊ मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद करुन मेणबत्ती, पणत्या आणि मोबाईल टॉर्चद्वारे दिवे लावल्याने संपूर्ण अंधारात दिव्यांच्या प्रकाशामुळे शहर उजळून निघाले. सटाणानाका, लोढाभुवन, बारा बंगला, कॅम्प, चर्चपरिसर मामलेदार गल्ली, शास्त्रीचौक भागासह शहरात दहा मिनिटांसाठी नागरिकांनी आपापल्या घरातील विजेचे दिवे बंद केले. हातात लहान मुलांसह महिला वर्गही मोबाईल टॉर्च, पणत्या, मेणबत्या पेटवून हातात धरल्या होत्या. यावेळी मात्र कुणीही घराबाहेर पडले नाही. केवळ आपापल्या घरातील व्हरांडा, बाल्कनी आणि घराघरात काही काळासाठी अंधार झाला होता. रस्त्यांवरील शुकशुकाटात घराघरात लखलखणाºया पणत्या मेणबत्या आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शहर ‘न्हावून’ निघाले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या