शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:18 AM

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.गोपालवाडीमार्गे जाणारा हा रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या रस्त्यावरून महेबूबनगर, सादिकनगर, गरीब नवाज कॉलनी या भागांतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. चार महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था वाढीस लागली असून, नागरिकांना आपली ‘वाट’ बदलावी लागत आहे. भूमिगत गटारीचे काम पूर्णत्वास येऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; मात्र रस्त्याची अवस्था अद्यापही ‘जैसे-थे’ असल्याने संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे तातडीने खडीकरण-डांबरीकरण करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे, अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. वारंवार महापालिका प्रशासनाच्या पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील या रस्त्याची दुर्दशा थांबत नसून रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या रस्त्याची अवस्था बिघडविण्यास महापालिका प्रशासन कारणीभूत आहे, कारण रस्ता भूमिगत गटारीसाठी खोदला गेला त्यानंतर त्याची दुरवस्था अधिक वाढीस लागली. तत्पूर्वी रस्त्यावरून ये-जा करणे सहज शक्य होते. सध्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, सोमवारी सायंकाळी व रविवारी रात्री आलेल्या बेमोसमी पावसाने रस्त्याची दैनावस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे; मात्र त्याचाही काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा