शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव-अजंग रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:00 IST

मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

ठळक मुद्देसंताप । भाजयुमो-राजगड प्रतिष्ठान व ग्रामस्थांचे उपोषण

वडनेर : मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.अजंग ते मालेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावाखाली ९ ते १० महिन्यांपासून रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. अरूंद रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वापरण्यात येणारा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न निर्माण झाला असून या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना रस्ता दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते; मात्र निवेदन देऊन पंधरा ते वीस दिवस उलटल्यानंतरही सदर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने शनिवारपासून (दि.१४) आमरण उपोषण करण्याचा निर्णय अजंग व वडेल ग्रामस्थांनी घेतला आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यापूर्वीही अनेकदा अपघात झाले असून, रस्ते अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अपघातात वाहनचालक जखमी होत आहेत; मात्र तरीही संबंधित खात्याने अजंग- मालेगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई करीत वेळकाढूपणा केला आहे. या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ व रस्ता दुरुस्तीच्या कामास गती मिळावी या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. अजंग ते मालेगाव रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही दखल न घेतल्यामुळे आज बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजप युवामोर्चाचे सुनील शेलार यांनी सांगितले.आजपर्यंत मालेगाव-नामपूर रस्त्यावर विविध अपघातात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजून किती लोकांचा जीव घेण्याची वाट प्रशासन बघणार आहे असा सवाल राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार यांनी उपस्थित केला आहे.भारतीय जनता युवा मोर्चाचे सुनील शेलार व राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार यांच्यासह शेखर पगार, रवि कन्नोर, भूषण बागुल, विकी पाटील, योगेश सोनवणे,प्रल्हाद सोनवणे, वसंत अहिरे, जगन्नाथ भदाणे, महेश तावडे, इम्तियाज शेख, विजय देवरे, हिरा बोरसे, योगेश पवार, सावकार शेलार, योगेश अहिरे आदींसह उपोषणकर्ते उपस्थित होते.वाहने खराब झाल्याने प्रवाशांचे हालमालेगाव ते अजंग दरम्यान मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. दररोज रिक्षा व जीप या रस्त्यावरून धावत असतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांमध्ये बिघाड होत आहे. वाहनांचे स्पेअरपार्ट्स तुटून पडत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे असल्याने वाहने कुठून चालवावीत, असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. मोठे वाहन गेले तर रस्त्यावर धुराळा उडत असतो. पाठीमागून चालणाºया दुचाकीस्वारालाही धुळीचा सामना करावा लागतो. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संबंधित ठेकेदार रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वेळकाढूपणा करीत आहे.

 

टॅग्स :StrikeसंपTrafficवाहतूक कोंडी