शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

संविधान टिकविण्यासाठी विवेक जागा करा : मंजूल भारद्वाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:45 PM

नाशिक : भारतीय अशी ओळख असण्यापेक्षा विशिष्ट धर्म आणि संस्कृतीची ओळख लादून समाजात रुढीवादी विचार रुजविणाऱ्या प्रवृत्तींमुळे राज्यघटनेचा मूळ ...

ठळक मुद्देडॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला

नाशिक : भारतीय अशी ओळख असण्यापेक्षा विशिष्ट धर्म आणि संस्कृतीची ओळख लादून समाजात रुढीवादी विचार रुजविणाऱ्या प्रवृत्तींमुळे राज्यघटनेचा मूळ विचार खोडून काढला जात आहे. कुणी प्रश्नच विचारू नये यासाठी वैचारिक गुलामगिरीचे बीज रुजविण्याचे काम सुरू असल्याने अशा लोकांच्या हातात असलेले संविधान टिकणार नाही, असे प्रतिपादन आंतरराष्टÑीय विचारवंत मंजूल भारद्वाज यांनी केले.सावाना औरंगाबाद सभागृह येथे संविधानप्रेमी नाशिककर यांच्या वतीने आयोजित डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेचे ७४ पुष्प भारद्वाज यांनी गुंफले. ‘सीएए, एनआरसी, एनपीआर आणि आम्ही भारतीय’ या विषयावर व्याख्यानात भारद्वाज म्हणाले. नागरिकत्व विरोधात आम्ही नाही तर धर्माच्या आधारावर नागरिकता देण्याच्या विरोधात आहोत. धर्माच्या आधारावर नागरिकता देणे हे घटनाबाह्य आहे. तुम्ही भारतीय असण्यापेक्षा तुमचा आवाज कोणता आहे, असा विचार रुजविला गेला आहे. वैचारिक भावनेचा हा उन्माद जनमनाला कलुषित करीत आहे. विविधता हे संविधाचे मूलतत्त्व असताना विविधतेने नटलेला समाज नाकारण्याची मानसिकता रुजविण्यात आलेली आहे. गेल्या ७० वर्षांत देशात काहीच झाले नाही, असा विचार रुजविण्याची मानसिकता करण्यात आली. गेल्या सहा वर्षांत विषवल्ली अधिक पसरली आणि माणसाला व्यक्तिगत धर्माच्या चौकटीत अडकवून टाकण्यात आले. वैचारिक बुद्धीभेदाने क्षीण झालेला समाज कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही, अशी सामाजिक मानसिकता निर्माण करण्यात आल्याने संविधान टिकविण्यासाठी आपल्यातील विवेक जागा करा, असे आवाहन भारद्वाज यांनी केले. प्रास्ताविक नितीन मते यांनी केले. संस्था परिचय राजू देसले यांनी करून दिला, तर पाहुण्यांचा परिचय शमसिया पठाण यांनी करून दिला. शाहीर श्रावस्ती मोहिते यांनी गीत सादर केले. सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी केले, आभार सविता जाधव यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक