शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

लोककल्याणाच्या योजना अंमलात आणणारे महात्मा बसवेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:58 IST

महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयीचा लेख...

महात्मा बसवेश्वरांचा जन्म वैशाख शु. अक्षयतृतीया सन ११०५ मध्ये कर्नाटकातील बागेवाडी, जि. विजापूर येथे झाला. श्रावण शुद्ध ५ (नागपंचमी) सन ११६७ मध्ये कूडल संगम, जिल्हा विजापूर येथे कृष्णा-मलप्रभा नद्यांच्या संगमात त्यांनी संजीवन जलसमाधी घेतली. (जन्मतारीख, वर्ष, जलसमाधी काल याबाबत मतभेद आहेत.)बसवेश्वरांनी शेती, वाणिज्य, सामूहिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, छोट्या उद्योगधंद्यात वाढ इत्यादी अनेक योजना आखल्या व त्या राबविल्या. शेतामध्ये विहिरी, तलाव, तळी-बंधारे यांच्या सोयी केल्या. सामूहिक श्रम आणि शिक्षणाची लोकांमध्ये आवड निर्माण केली. सामान्य आणि दलित लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आठशे वर्षांपूर्वी (बाराव्या शतकात) गरिबी हटावसारख्या योजना आखल्या व यशस्वीरीत्या पार पाडल्या.महात्मा बसेश्वर मनाने, विचाराने आणि कृतीने संत (शिवशरण) होते. ध्यान, चिंतन आणि मनन करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या दृष्टीने धर्मशील पुरुष राज्यकर्ता असावा. धर्म म्हणजे ईश्वरी गुण, धर्मशील म्हणजे ईश्वरी गुण धारण करणारा ईश्वर हा विश्वाचा शासनकर्ता आहे. राजा हा राष्ट्राचा शासनकर्ता असतो. राजा किंवा राज्यकर्ता ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून विश्वाच्या त्या भागावर राज्य करीत असतो. म्हणून जे जे ईश्वराचे गुण ते ते गुण राज्यकर्त्यांमध्ये असावे लागतात. बसेश्वरांच्या दृष्टीने राजसत्ता हे साधन आहे आणि राष्ट्राचे अंतिम हित हे साध्य आहे. राष्ट्र म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराची सगुण-साकार मूर्ती होय. आपल्या उन्नतीसाठी व्यक्तींनी, समाजांनी आणि राज्यकर्त्यांनी त्यांची पूजा करायला हवी. उन्नतीसाठी झटावयास हवे, असे त्यांना वाटे.महात्मा बसवेश्वर हे अवतारी पुरुष होते. उपजतच त्यांच्या ठिकाणी ईश्वरी गुण होते. त्यांचे हृदय शिवशरणांचे, संतांचे होते. ते धर्मशील होते. प्रापंचिक असूनही विरक्त होते. ते विज्जळ राजाचे प्रधानमंत्री होते. आदर्श शासनकर्ते होते. बालपणापासून अनेक आदर्शांची स्वप्ने ते उराशी बाळगून होते. वयाच्या २१व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या. त्या वयापर्यंत त्यांना सगुण साकार ईश्वराचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण निराकार ईश्वराचा साक्षात्कार झाला होता. राज्यकारभार स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावा हे महात्मा बसवेश्वरांचे जीवनसूत्र होते.अनिल लक्ष्मण कोठुळे-उत्तर महाराष्ट्र प्रमुख :अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना

टॅग्स :NashikनाशिकPersonalityव्यक्तिमत्व