शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

महाराष्ट्राला दररोज आयात करावी लागतात एक कोटी अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:13 AM

नाशिक : कोरोनामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे सध्या बाजारात अंड्याचे दरात वाढ ...

नाशिक : कोरोनामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे सध्या बाजारात अंड्याचे दरात वाढ झाली असून, उत्पादनातील तूट भरुन काढण्यासाठी महाराष्ट्राला परराज्यातून सुमारे एक कोटी अंडी आयात करावी लागत आहेत. अंडी उष्ण असल्यामुळे अनेक डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला रुग्णांना देतात. यामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अंड्यांचे दरही वाढले असून, सध्या फार्म लिफ्टींगला पाच रुपये १५ पैसे प्रतिनग इतका दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात सहा ते सात रुपये प्रतिनग याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. ऊन्हाळ्यामुळे अनेक पोल्ट्री फार्मवर पाण्याची समस्या निर्माण होते. यामुळे अनेक पोल्ट्रीचालक उन्हाळ्यात पक्षी ठेवत नाहीत. याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो. महाराष्ट्राला साधारणत: दररोज तीन कोटी अंडी लागतात, त्यातील दोन लाखांपर्यंत महाराष्ट्रात उत्पादन होते तर आंध्र, तेलंगणा, गुजरात या राज्यांमधून साधारणत: एक कोटी अंडी आयात करावी लागतात. महाराष्ट्रात अंडी उत्पादन करणाऱ्या पोल्ट्री फार्मची संख्या कमी असल्यामुळे दरराेज अंड्यांची आयात करावी लागते. सध्या मागणी अधिकच असल्याने त्यात वाढ झाली आहे.

कोट -

मध्यंतरीच्या काळात पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला होता. याशिवाय कोंबडी खाद्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १,३०० रुपये क्विंटल असलेला मका १,७०० रुपयांवर तर सोयामिल ४० हजारांवरुन ७० हजार रुपये टनापर्यंत पोहोचले आहे. ही दोन प्रमुख खाद्य महागल्याने अंडी उत्पादनाचा दरही महागला आहे. पूर्वी एका अंड्याच्या उत्पादनासाठी तीन रुपये खर्च येत होता तो आता चार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

- उद्धव आहिरे, राज्य सचिव, महाराष्ट्र पाेल्ट्री फार्म ब्रिडर्स असोसिएशन