शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Maharashtra Election 2019: राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 20:02 IST

Maharashtra Election 2019: विशेष म्हणजे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता मनसेला पंधरा पैकी अवघे आठ जागेंवर उमेदवार मिळाले.

संजय पाठक 

नाशिक- ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढावायची त्या बिनीच्या शिलेदाराने शस्त्र गहाण टाकावी किंवा अगोदरच शत्रुपक्षाला जाऊन मिळावे अशी अवस्था नाशिकमध्येराज ठाकरे यांच्याबाबतीत झाली आहे. एकीकडे पक्षाकडे पुरसे उमेदवार नाही, त्यामुळे अन्य पक्षांकडील नाकारलेले स्वीकारण्याची वेळ आणि दुसरीकडे मात्र पक्षात ज्यांना सर्वेसर्वा केले त्यांनीच पळ काढून भाजपाचे कमळ हाती घेतले. ज्या जिल्ह्यात पंधरा जागा लढवायची राज यांनी तयारी केली त्या जिल्ह्यात पंधरा पैकी पाच जागांवर उमेदवार मिळाले. त्यामुळे एकंदरच राज यांच्या नाशिकमधील करिष्मा कमी झाला की काय अशीच शंका निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता मनसेला पंधरा पैकी अवघे आठ जागेंवर उमेदवार मिळाले. त्यातील पाच जण आगंतूक आहेत. उर्वरित जागांना अन्य पक्षांतील उमेदवारदेखील मिळाले नाहीत. मनसे स्थापन करताना राज यांना सर्वाधिक साथ नाशिककरांनी दिली होती. राज यांच्या संपर्कातील शिवसेनेतील अनेक नेते कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले. त्यात वसंत गिते यांचे नाव आघाडीवर होते. अतुल चांडक हे राज यांचे व्यक्तिगत मित्र, परंतु तेदेखील राजकारणात उतरले. वसंत गिते आणि अतुल चांडक यांना नाशिकची पूर्ण सूत्रे देतानाच त्यांना जणू नाशिकची मनसबदारी देण्यात आली होती. कोणताही निर्णय मुंबईला न होता नाशिकमध्येच घेतले जात. त्यावेळी राज यांच्या नावाने वातावरण भारावले होते. त्याचा परिणाम २००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी तीन जागा मनसेला मिळाल्या. त्यामुळे पारंपरिक पक्षांना मोठा धक्का बसला. इतकेच नव्हे तर नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चाळीस जागांचा टप्पा मनसेने पार केला. परंतु, सत्ता येत असताना सर्व सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्या हाती एकवटली होती. परंतु तेथूनच कुरबुरींना सुरुवात झाली. वयाने ज्येष्ठ असलेले पक्षाचे आमदार अ‍ॅड. (कै.) उत्तमराव ढिकले यांनादेखील डावलण्यात आले, त्यानंतर राज यांच्याकडे गिते- चांडक या जोडगोळीविषयी तक्रारींचा पाढा सुरू झाला. राज यांनी त्या तक्रारींवर विश्वास ठेवला आणि जोडगोळीचे पंख छाटले. त्यामुळे गिते यांनी पक्ष सोडला ते भाजपात गेले. त्यानंतर अतुल चांडक हे मुळातच राजकारणी नव्हते. सर्व पक्षीय संबंध असताना केवळ राज यांच्या मित्रत्वाच्या नात्याने ते पक्षीय राजकारणात उतरले होते. त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. त्यानंतर शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली.

पक्षाने मुंबईहून नियुक्त केलेले संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनीदेखील त्यावर विशेष मेहेरनजर होती. त्यामुळे पक्षात काय चाललंय हे राज यांनी बघितलेच नाही. राहुल यांना स्थायी समिती सभापतिपदासारखे मौल्यवान पद, प्रदेश पातळीवर उपाध्यक्षपद असे मानाचे पान दिले. परंतु पक्षाचा विस्तार झाला नाही. संघटनात्मक बैठका नाही की, आंंदोलने नाही. मनसेची आज अवस्था बिकट आहे. त्यातच राज यांची निवडणूक लढवावी किंवा नाही अशी द्विधा मन:स्थिती झाली. परंतु नंतर त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला खरा. अशावेळी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या राहुल ढिकले यांना उमेदवारी विशेष नव्हती. मनसेची सर्व सूत्रे त्यातच प्रदेशपातळीवरील पद असे सर्व काही दिले असतानाही राहुल ढिकले हे विधानसभेसाठी अगतिक झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीगाठी घेतल्या असे सांगितले जाते. त्यामुळे राज ठाकरे नाराज झाले आणि त्यातून त्यांनी मनसेतून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. साहजिकच राज यांनीदेखील त्यांंच्याविषयी नाराजी व्यक्त केली. परंतु गिते आणि चांडकांसारखा मोहरा गमवून ‘याचसाठी अट्टाहास...’ म्हणण्याची वेळ सध्या पक्षावर आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेVasant Giteवसंत गीतेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019