शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Maharashtra Election 2019: भाजपच्या विरोधातील शिवसेनेच्या बंडखोरीला वरिष्ठ नेत्यांचाच आशीर्वाद?

By संजय पाठक | Updated: October 12, 2019 18:15 IST

नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचा एक बंडखोर नाही तर त्याला पाठिंबा देणारे २२ नगरसेवक बंडखोर आहेत.

>> संजय पाठक, नाशिक 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन भाजपच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना थोपविण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भेटून बंद खोलीआड चर्चादेखील केली त्यामुळे बंडखोरी थोपवण्यासाठी आलेल्या संजय राऊत यांच्या विषयी पक्षातील बंडखोरांना नक्की काय संदेश जाणार? नाशिकच्या पश्चिम मतदारसंघातील बंडखोरांनी प्रतिप्रश्न केल्यानंतर राऊत यांनी त्यांच्या समोर हात टेकले आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय सोपविला, असे सांगितले जात असले तरी उत्तर महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुखाला नगरसेवक जुमानत नाही यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, त्यामुळेच जे घडते त्यामागे सेनेच्या वरिष्ठांचाच 'आशीर्वाद' तर नव्हे ना अशीदेखील शंका निर्माण झाली आहे.

नाशिक पश्चिममधून युतीचा उमेदवार म्हणून भाजपच्या वतीने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याने हा मतदार मिळालाच पाहिजे यासाठी हटून बसलेल्या शिवसैनिकांनी बंड पुकारले आणि विलास शिंदे यांना उभे केले. सध्याच्या त्यांच्या प्रचारात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार असे लिहिले जात असून, त्यांच्या प्रचार साहित्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांच्याच छबी आहेत. त्यानंतर या बंडखोरांना शमविण्यासाठी भाजपचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि.१०) नाशिक मुक्कामी असलेल्या खासदार संजय राऊत यांना साकडे घातले. त्यासाठी पूर्वाश्रमी शिवसैनिक आणि सध्या भाजपात प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल आणि वसंत गिते यांना दूत म्हणून धाडले. त्यांच्या तक्रारींची दखल घेत खासदारांनी तत्काळ शिवसेनेचे नगरसेवक आणि बंडखोर विलास शिंदे यांची बैठक घेतली खरी, परंतु त्यांनीच पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले त्यामुळे राऊत यांना नाईलाज झाला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडेच हा विषय सोपविला. शिवसेनेची एवढी मवाळ भाषा प्रथमच दिसत आहे. त्यामुळेच एरव्ही 'आदेश म्हणजे आदेश' म्हणणारा शिवसैनिक आदेश जुमानणार नाही म्हणतो तेव्हा एकतर तो पक्षाच्या आदेशाने खोटे बोलतो किंवा पक्षाने काढून टाकले तरी बेहत्तर या निर्वाणीच्या भूमिकेत आलेला दिसतो.

नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचा एक बंडखोर नाही तर त्याला पाठिंबा देणारे २२ नगरसेवक बंडखोर आहेत. त्यांना काढण्याची हिम्मत शिवसेनेने करावी तर पुढील महिन्यात लगोलग नाशिक महापालिकेत महापौरपदाची निवडणूक आहे. मुळातच नाशिक महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. विधानसभा निवडणुकीतील फाटाफूट पथ्यावर पाडून घेऊन सेनेला सत्ता संपादन करायचे आहे अशा स्थितीत आपल्या पक्षातील तब्बल २२ बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यापेक्षा सेनेने शांत आणि सोयीची भूमिका घेण्याचे ठरवलेले दिसते. अर्थात, त्याचा परिणाम केवळ विधानसभेच्या निवडणुकीवरच नाही तर एकंदरच राजकारणावर होणार हेही तितकेच खरे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाnashik-west-acनाशिक पश्चिमnashik-east-acनाशिक पूर्वnashik-central-acनाशिक मध्य