शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Maharashtra Election 2019: भाजपच्या विरोधातील शिवसेनेच्या बंडखोरीला वरिष्ठ नेत्यांचाच आशीर्वाद?

By संजय पाठक | Updated: October 12, 2019 18:15 IST

नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचा एक बंडखोर नाही तर त्याला पाठिंबा देणारे २२ नगरसेवक बंडखोर आहेत.

>> संजय पाठक, नाशिक 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन भाजपच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना थोपविण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भेटून बंद खोलीआड चर्चादेखील केली त्यामुळे बंडखोरी थोपवण्यासाठी आलेल्या संजय राऊत यांच्या विषयी पक्षातील बंडखोरांना नक्की काय संदेश जाणार? नाशिकच्या पश्चिम मतदारसंघातील बंडखोरांनी प्रतिप्रश्न केल्यानंतर राऊत यांनी त्यांच्या समोर हात टेकले आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय सोपविला, असे सांगितले जात असले तरी उत्तर महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुखाला नगरसेवक जुमानत नाही यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, त्यामुळेच जे घडते त्यामागे सेनेच्या वरिष्ठांचाच 'आशीर्वाद' तर नव्हे ना अशीदेखील शंका निर्माण झाली आहे.

नाशिक पश्चिममधून युतीचा उमेदवार म्हणून भाजपच्या वतीने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याने हा मतदार मिळालाच पाहिजे यासाठी हटून बसलेल्या शिवसैनिकांनी बंड पुकारले आणि विलास शिंदे यांना उभे केले. सध्याच्या त्यांच्या प्रचारात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार असे लिहिले जात असून, त्यांच्या प्रचार साहित्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांच्याच छबी आहेत. त्यानंतर या बंडखोरांना शमविण्यासाठी भाजपचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि.१०) नाशिक मुक्कामी असलेल्या खासदार संजय राऊत यांना साकडे घातले. त्यासाठी पूर्वाश्रमी शिवसैनिक आणि सध्या भाजपात प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल आणि वसंत गिते यांना दूत म्हणून धाडले. त्यांच्या तक्रारींची दखल घेत खासदारांनी तत्काळ शिवसेनेचे नगरसेवक आणि बंडखोर विलास शिंदे यांची बैठक घेतली खरी, परंतु त्यांनीच पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले त्यामुळे राऊत यांना नाईलाज झाला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडेच हा विषय सोपविला. शिवसेनेची एवढी मवाळ भाषा प्रथमच दिसत आहे. त्यामुळेच एरव्ही 'आदेश म्हणजे आदेश' म्हणणारा शिवसैनिक आदेश जुमानणार नाही म्हणतो तेव्हा एकतर तो पक्षाच्या आदेशाने खोटे बोलतो किंवा पक्षाने काढून टाकले तरी बेहत्तर या निर्वाणीच्या भूमिकेत आलेला दिसतो.

नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचा एक बंडखोर नाही तर त्याला पाठिंबा देणारे २२ नगरसेवक बंडखोर आहेत. त्यांना काढण्याची हिम्मत शिवसेनेने करावी तर पुढील महिन्यात लगोलग नाशिक महापालिकेत महापौरपदाची निवडणूक आहे. मुळातच नाशिक महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. विधानसभा निवडणुकीतील फाटाफूट पथ्यावर पाडून घेऊन सेनेला सत्ता संपादन करायचे आहे अशा स्थितीत आपल्या पक्षातील तब्बल २२ बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यापेक्षा सेनेने शांत आणि सोयीची भूमिका घेण्याचे ठरवलेले दिसते. अर्थात, त्याचा परिणाम केवळ विधानसभेच्या निवडणुकीवरच नाही तर एकंदरच राजकारणावर होणार हेही तितकेच खरे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाnashik-west-acनाशिक पश्चिमnashik-east-acनाशिक पूर्वnashik-central-acनाशिक मध्य