शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2024 07:47 IST

विनोद तावडे म्हणाले की, शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : भाजपमध्ये तिकीट वाटपाची एक पद्धती आहे. ज्यात कार्यकर्त्यांचे, जनतेचे मत सर्वेक्षणाच्या माध्यमातून समजावून घेतले जाते. त्याआधारे प्राधान्यक्रम ठरवला जातो. सामाजिक, राजकिय, सर्व बाजूंनी विचार, चर्चा केल्यानंतर जागा ठरवण्याची पद्धत आहे. त्यानंतर विद्यमान आमदाराला तिकीट दिल्यास पुन्हा निवडून येणे अवघड असल्यास तेथे नवीन प्रयोग करण्याचा विचार केला जातो. त्यानुसार काही विद्यमान जागांचा पुनर्विचार केल्यामुळेच नाशिकमधील एका जागेचे नाव पहिल्या यादीत दिले नाही, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. 

नाशिक दौऱ्यादरम्यान महायुतीच्या मीडिया सेंटरच्या उ‌द्घाटन प्रसंगी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्यांपैकी कोणा एकालाच तिकीट मिळू शकते. त्यामुळे इतर इच्छुक नाराज होणे स्वाभाविक आहे. राजकारणात आकांक्षा असणे चूक नाही. त्यातून काही जण बंडखोरी करतात. अर्ज भरलेल्यांशी चर्चा करून त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

२०१९ साली मोदींचे फोटो छापून, त्यांच्या सभा घेऊन लढलेल्या शिवसेनेने निवडणुकीनंतर आकडेवारी पाहून गद्दारी केली. जिथे बाळासाहेबांचे वास्तव्य होते, त्याच मातोश्रीमधून गद्दारी पाहायला मिळणे हे दुर्दैवी होते. आम्ही युतीतील घटक पक्ष 'महायुती' म्हणून एकत्र लढत आहोत. महायुती म्हणूनच सरकार बनवू, आमची नियत निवडणुकी आधी वेगळी आणि निवडणुकीनंतर वेगळी कधीच नसते, असे म्हणत त्यांनी उद्धवसेनेला टोलाही लगावला.

...त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही

मंडल आयोग लागू झाले, त्यावेळी शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. आमच्या पेक्षा जास्त काळ काँग्रेस आणि शरद पवार सत्तेत मुख्यमंत्री पदावर राहिले. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण देऊन कोर्टात टिकवून दाखवले. त्यानंतर कोणीतरी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. उद्धवसेनेच्या गद्दारीमुळे २०१९ आमचे सरकार गेल्यानंतर पुढील ५ तारखांना राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी गेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला फटका बसला.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinod Tawdeविनोद तावडेNashikनाशिकnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक