शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

महादेवपूर-डंबाळेवाडी- दुगाव रस्ता मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:10 IST

दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे.

गंगापूररोड : दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे.  शेतकरी एकत्र आले तर गावाचे चित्र बदलू शकतात, हे सिद्ध करून दाखविणारी ही घटना आहे. नुकतेच महादेवपूर गावचे सरपंच झालेले विलास सांडखोरे यांनी दोन शेतकºयांच्या वादामुळे रखडलेला शिवरस्ता सामंजस्याने मोकळा करवून घेतला आहे. या रस्त्यासंदर्भात दोन शेतकºयांमध्ये टोकाचा वाद असल्याने गावाच्या विकासाला अडचणदेखील निर्माण झाली होती. त्यामुळे विकासाची कामेदेखील खोळंबली होती. अखेर गेल्या २५ वर्षांपासूनचा वाद संपुष्टात आल्याने परिसरातील शेतकरी व गावांना त्याचा फायदा होणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.  गावातील सरपंच विलास सांडखोरे आणि ग्रामपंचायत सदस्य अलका कैलास डावरे यांनी ही बाब ओळखून रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले.शेतकºयांचे आर्थिक नुकसान टळणारमहादेवपूर गावातील शिवार रस्ता गेल्या २५ वर्षांपासून भिजत प्रलंबित होता. या रस्त्यामुळे दोन गावांतील अंतर वाढले होते. सदर रस्ता मोकळा व्हावा, असे बहुतेकांना वाटत होते. यासाठी अनेकदा प्रयत्नदेखील झाले. मात्र रस्ता अडवून बसलेल्यांना सांगायचे कुणी? उगाच वादास निमंत्रण नको अशी भीती ग्रामस्थांनादेखील वाटत होती. येथून जाणाºया शेतकºयांना आपला माल बाजारात घेऊन जाताना मोठा चक्कर मारावा लागत असल्याने आर्थिक नुकसान आणि वेळेचा दुरुपयोगदेखील होत होता.कैलास डावरे व राजू डावरे यांनी आपल्या मालकीची जमीन रस्त्याच्या कामासाठी खुली करून दिली. दरम्यान, त्याठिकाणी मोठा रास्ता तयार झाल्यास परिसरातील १०० ते १५० शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे. परिणामी गावाचा विकास होणार असल्याने या रस्त्यात ज्या शेतकºयांची जमीन जाणार आहे. त्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील गैरसमज काढून दोन गावांतील अंतर आणि परिसरातील शेतकºयांचा प्रश्न कशा पद्धतीने सुटेल याविषयी पटवून दिले. रस्ता मोकळा झाल्याने परिसरातील शेतकºयांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून आभार मानले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदsarpanchसरपंच