शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:40 IST

प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.

नाशिक : प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. शनिवारी (दि.२४) मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे नाशिक जिल्ह्यातील ओझर मिग गावचे हरेंद्र जाधव हे पेशाने शिक्षक होते. त्यांचे वडील मुंबईत असल्याने त्यांचे आयुष्य मुंबईतच गेले. १६ फेब्रुवारी, १९३३ रोजी जन्मलेले हरेंद्र जाधव यांच्यावर लहानपणापासूनच आंबेडकरी जलशांचा प्रभाव होता. जाधव यांनी बुद्धम् शरणंम् गच्छामी, धम्मंम् शरणंम् गच्छामी..., भीमाच्या धोरणाचा अभिमान पाहिजे, नेता असा आम्हाला गुणवान पाहिजे...., पाहा पाहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा…, तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता, अवघ्या दिनांच्या नाथा…, माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू, बाई देव पावलाय गं..., आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी प्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आतापर्यंत त्यांच्या लेखणीतून शेकडो गीतरचना शब्दांकित झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांची काही गाणी मुंबईतील सेंटर प्रकाशनाने नऊ भागांत पुस्तकरूपात प्रकाशित केली आहेत. लोकगायक रंजना शिंदे, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे यांसह अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सरगम या प्रतिथयश गायकांनी आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक शाहिरांनी त्यांची गाणी गायिली आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले कवी हरेंद्र जाधव हे लोकशिक्षकही असल्याने, त्यांना आदराने ‘गुरुजी’ या उपाधीने संबोधले जात होते. एक जिज्ञासू, मितभाषी, संयमी, संवेदनशील, परंतु कवी मनाचा चिंतनशील सर्जक अशी त्यांची ओळख प्रचलित राहिलेली आहे. प्रसिद्ध लोककवी व शाहीर वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्या स्नेहातूनच नाशिकमध्ये स्थापन झालेल्या ‘महाकवी वामनदादा कर्डक’ प्रतिष्ठानाशी त्यांचे अतूट नाते होते. समतावादी चळवळीशी बांधिलकी जपणारे, आंबेडकरी विचारांचा व चळवळीचा भाष्यकार असलेले कवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी शकुंतला, मुलगी तारका असा परिवार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू