शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:40 IST

प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.

नाशिक : प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. शनिवारी (दि.२४) मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे नाशिक जिल्ह्यातील ओझर मिग गावचे हरेंद्र जाधव हे पेशाने शिक्षक होते. त्यांचे वडील मुंबईत असल्याने त्यांचे आयुष्य मुंबईतच गेले. १६ फेब्रुवारी, १९३३ रोजी जन्मलेले हरेंद्र जाधव यांच्यावर लहानपणापासूनच आंबेडकरी जलशांचा प्रभाव होता. जाधव यांनी बुद्धम् शरणंम् गच्छामी, धम्मंम् शरणंम् गच्छामी..., भीमाच्या धोरणाचा अभिमान पाहिजे, नेता असा आम्हाला गुणवान पाहिजे...., पाहा पाहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा…, तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता, अवघ्या दिनांच्या नाथा…, माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू, बाई देव पावलाय गं..., आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी प्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आतापर्यंत त्यांच्या लेखणीतून शेकडो गीतरचना शब्दांकित झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांची काही गाणी मुंबईतील सेंटर प्रकाशनाने नऊ भागांत पुस्तकरूपात प्रकाशित केली आहेत. लोकगायक रंजना शिंदे, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे यांसह अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सरगम या प्रतिथयश गायकांनी आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक शाहिरांनी त्यांची गाणी गायिली आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले कवी हरेंद्र जाधव हे लोकशिक्षकही असल्याने, त्यांना आदराने ‘गुरुजी’ या उपाधीने संबोधले जात होते. एक जिज्ञासू, मितभाषी, संयमी, संवेदनशील, परंतु कवी मनाचा चिंतनशील सर्जक अशी त्यांची ओळख प्रचलित राहिलेली आहे. प्रसिद्ध लोककवी व शाहीर वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्या स्नेहातूनच नाशिकमध्ये स्थापन झालेल्या ‘महाकवी वामनदादा कर्डक’ प्रतिष्ठानाशी त्यांचे अतूट नाते होते. समतावादी चळवळीशी बांधिलकी जपणारे, आंबेडकरी विचारांचा व चळवळीचा भाष्यकार असलेले कवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी शकुंतला, मुलगी तारका असा परिवार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू