शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तोट्यातील बस सेवेची नाशिककरांच्या खिशाला बसणार झळ

By संजय पाठक | Updated: September 28, 2019 23:42 IST

नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्याने भविष्यात महापालिकेला तोटा तर सहन करावा लागेलच, शिवाय तो भरण्यासाठी नागरीकांच्या खिशाला चाट लागली तर नवल वाटायला नको.

ठळक मुद्देतोटा झाला तरी कंपन्यांना रक्कम द्यावीच लागणारभरपाईसाठी नाशिककरांवर कराचा बोजा शक्य

संजय पाठक, नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्याने भविष्यात महापालिकेला तोटा तर सहन करावा लागेलच, शिवाय तो भरण्यासाठी नागरीकांच्या खिशाला चाट लागली तर नवल वाटायला नको.

शहरात बस सेवा चालविण्याची जबाबदारी ही राज्य परिवहन महामंडळाची नसून महापालिकेचीच आहे असे सातत्याने सांगितले गेले. त्यामुळेच सहा वेळा महापालिकेच्या दरबारी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु तो फेटाळण्यात आला होता. याचे कारण महामंडळ कोणत्याही आधारे हा प्रस्ताव महापालिकेच्या गळ्यात मारत असले तरी महापालिकेच्या अधिनियमात मात्र ही सेवा बंधनात्मक नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने मात्र सकारात्मक प्रतिसाद नव्हता. परंतु आता राज्य सरकारनेच ही सेवा गळ्यात मारल्यानंतर ती स्विकारणे भाग पडलेच. आता या सेवेसाठी बस ग्रास रूट कॉंंटॅक्ट पध्दतीने देण्याचा प्रस्ताव मंजुर झाला आहे. मात्र तो मंजुर करताना महापालिकेच्याच अधिकाऱ्यांनी स्थायी समितीला माहिती देताना दरवर्षी साधारणत: वीस कोटी रूपयांचा तोटा येईल असे नमुद केले आहे. तोट्याची ही रक्कम वाढण्याची देखील शक्यता आहे.

गेल्यावर्षी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी ग्रॉस रूट कॉन्ट्रॅक्टचे मॉडेल मांडले आणि ते चांगले असल्याचा दावा केला. त्यावेळी नागपुरात अशाप्रकारचे मॉडेल असूनही ते स्विकारणाºया कंपन्यांनी महापालिकेकडे रक्कम थकली म्हणून बस सेवा बंद केली आणि नागरीकांचे हाल झाले अशा बातम्या होत्या. त्यामुळे नाशिक मध्ये आज वीस कोटी रूपयांचा तोटा कमी वाटत असला तरी भविष्यात तो वाढू शकतो आणि हीच समस्या नाशिकमध्ये देखील निर्माण होऊ शकते. महापालिका अशा तोट्यातील सेवांची भरपाई करण्यासाठी दुसरे करणार तरी काय तर कराचा बोजा वाढवून नागरीकांच्या खिशाला चाट लावणे हाच एक पर्याय असू शकतो आणि तोच गंभीर आहे. विधान सभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागु होण्याच्या आधी घाईघाईने हा प्रस्ताव मंजुर झाला आहे. त्यामुळे कोणी चर्चा केली नाही की हरकत घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींची उदासिनता मात्र नाशिककरांना झळ पोहोचवले हे निश्चित आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnagpurनागपूर