शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तोट्यातील बस सेवेची नाशिककरांच्या खिशाला बसणार झळ

By संजय पाठक | Updated: September 28, 2019 23:42 IST

नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्याने भविष्यात महापालिकेला तोटा तर सहन करावा लागेलच, शिवाय तो भरण्यासाठी नागरीकांच्या खिशाला चाट लागली तर नवल वाटायला नको.

ठळक मुद्देतोटा झाला तरी कंपन्यांना रक्कम द्यावीच लागणारभरपाईसाठी नाशिककरांवर कराचा बोजा शक्य

संजय पाठक, नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्याने भविष्यात महापालिकेला तोटा तर सहन करावा लागेलच, शिवाय तो भरण्यासाठी नागरीकांच्या खिशाला चाट लागली तर नवल वाटायला नको.

शहरात बस सेवा चालविण्याची जबाबदारी ही राज्य परिवहन महामंडळाची नसून महापालिकेचीच आहे असे सातत्याने सांगितले गेले. त्यामुळेच सहा वेळा महापालिकेच्या दरबारी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु तो फेटाळण्यात आला होता. याचे कारण महामंडळ कोणत्याही आधारे हा प्रस्ताव महापालिकेच्या गळ्यात मारत असले तरी महापालिकेच्या अधिनियमात मात्र ही सेवा बंधनात्मक नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने मात्र सकारात्मक प्रतिसाद नव्हता. परंतु आता राज्य सरकारनेच ही सेवा गळ्यात मारल्यानंतर ती स्विकारणे भाग पडलेच. आता या सेवेसाठी बस ग्रास रूट कॉंंटॅक्ट पध्दतीने देण्याचा प्रस्ताव मंजुर झाला आहे. मात्र तो मंजुर करताना महापालिकेच्याच अधिकाऱ्यांनी स्थायी समितीला माहिती देताना दरवर्षी साधारणत: वीस कोटी रूपयांचा तोटा येईल असे नमुद केले आहे. तोट्याची ही रक्कम वाढण्याची देखील शक्यता आहे.

गेल्यावर्षी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी ग्रॉस रूट कॉन्ट्रॅक्टचे मॉडेल मांडले आणि ते चांगले असल्याचा दावा केला. त्यावेळी नागपुरात अशाप्रकारचे मॉडेल असूनही ते स्विकारणाºया कंपन्यांनी महापालिकेकडे रक्कम थकली म्हणून बस सेवा बंद केली आणि नागरीकांचे हाल झाले अशा बातम्या होत्या. त्यामुळे नाशिक मध्ये आज वीस कोटी रूपयांचा तोटा कमी वाटत असला तरी भविष्यात तो वाढू शकतो आणि हीच समस्या नाशिकमध्ये देखील निर्माण होऊ शकते. महापालिका अशा तोट्यातील सेवांची भरपाई करण्यासाठी दुसरे करणार तरी काय तर कराचा बोजा वाढवून नागरीकांच्या खिशाला चाट लावणे हाच एक पर्याय असू शकतो आणि तोच गंभीर आहे. विधान सभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागु होण्याच्या आधी घाईघाईने हा प्रस्ताव मंजुर झाला आहे. त्यामुळे कोणी चर्चा केली नाही की हरकत घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींची उदासिनता मात्र नाशिककरांना झळ पोहोचवले हे निश्चित आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnagpurनागपूर