शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

तोट्यातील बस सेवेची नाशिककरांच्या खिशाला बसणार झळ

By संजय पाठक | Updated: September 28, 2019 23:42 IST

नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्याने भविष्यात महापालिकेला तोटा तर सहन करावा लागेलच, शिवाय तो भरण्यासाठी नागरीकांच्या खिशाला चाट लागली तर नवल वाटायला नको.

ठळक मुद्देतोटा झाला तरी कंपन्यांना रक्कम द्यावीच लागणारभरपाईसाठी नाशिककरांवर कराचा बोजा शक्य

संजय पाठक, नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्याने भविष्यात महापालिकेला तोटा तर सहन करावा लागेलच, शिवाय तो भरण्यासाठी नागरीकांच्या खिशाला चाट लागली तर नवल वाटायला नको.

शहरात बस सेवा चालविण्याची जबाबदारी ही राज्य परिवहन महामंडळाची नसून महापालिकेचीच आहे असे सातत्याने सांगितले गेले. त्यामुळेच सहा वेळा महापालिकेच्या दरबारी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु तो फेटाळण्यात आला होता. याचे कारण महामंडळ कोणत्याही आधारे हा प्रस्ताव महापालिकेच्या गळ्यात मारत असले तरी महापालिकेच्या अधिनियमात मात्र ही सेवा बंधनात्मक नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने मात्र सकारात्मक प्रतिसाद नव्हता. परंतु आता राज्य सरकारनेच ही सेवा गळ्यात मारल्यानंतर ती स्विकारणे भाग पडलेच. आता या सेवेसाठी बस ग्रास रूट कॉंंटॅक्ट पध्दतीने देण्याचा प्रस्ताव मंजुर झाला आहे. मात्र तो मंजुर करताना महापालिकेच्याच अधिकाऱ्यांनी स्थायी समितीला माहिती देताना दरवर्षी साधारणत: वीस कोटी रूपयांचा तोटा येईल असे नमुद केले आहे. तोट्याची ही रक्कम वाढण्याची देखील शक्यता आहे.

गेल्यावर्षी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी ग्रॉस रूट कॉन्ट्रॅक्टचे मॉडेल मांडले आणि ते चांगले असल्याचा दावा केला. त्यावेळी नागपुरात अशाप्रकारचे मॉडेल असूनही ते स्विकारणाºया कंपन्यांनी महापालिकेकडे रक्कम थकली म्हणून बस सेवा बंद केली आणि नागरीकांचे हाल झाले अशा बातम्या होत्या. त्यामुळे नाशिक मध्ये आज वीस कोटी रूपयांचा तोटा कमी वाटत असला तरी भविष्यात तो वाढू शकतो आणि हीच समस्या नाशिकमध्ये देखील निर्माण होऊ शकते. महापालिका अशा तोट्यातील सेवांची भरपाई करण्यासाठी दुसरे करणार तरी काय तर कराचा बोजा वाढवून नागरीकांच्या खिशाला चाट लावणे हाच एक पर्याय असू शकतो आणि तोच गंभीर आहे. विधान सभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागु होण्याच्या आधी घाईघाईने हा प्रस्ताव मंजुर झाला आहे. त्यामुळे कोणी चर्चा केली नाही की हरकत घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींची उदासिनता मात्र नाशिककरांना झळ पोहोचवले हे निश्चित आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnagpurनागपूर