शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Lok Sabha Election 2019; वाद निरर्थक : राज्यात ‘रमजान’पुर्व आटोपणार लोकसभेचे मतदान !

By अझहर शेख | Published: March 12, 2019 2:11 PM

रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल,

ठळक मुद्देमतदानप्रक्रिया आणि रमजान पर्वचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. राज्यात 'रमजान'च्या आठवडाभर अगोदर मतदानप्रक्रिया पूर्ण होत आहे

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान ११ एप्रिल तर दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल, तीसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल आणि मतदानाचा अखेरचा चौथा टप्पा २९ एप्रिलला पुर्ण होत आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व ६ मेपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे रमजानच्या अगोदर राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपत आहे. तसेच काही राज्यांत रमजानकाळत मतदानाच्या तारखा येत असल्या तरी त्याचा फारसा परिणाम मतदानावर किंवा निवडणूक प्रक्रियेवर होणार नाही, असे मत नाशिक शहरातील सुन्नी मुस्लीम धर्मगुरूंनी व्यक्त केले आहे.निवडणूकांच्या तारखा रमजानकाळात जाहीर झाल्याने बोटावर मोजण्याइतक्या काही धार्मिक संघटनांनी आक्षेप नोंदविला होता. यामुळे नवा वाद उभा राहिला; मात्र निवडणूक आयोगाने या आक्षेपावर स्पष्टीकरण देत पडदा टाकला. यासंदर्भात नाशिकमधील काही धर्मगुरूंशी चर्चा केली असता त्यांनीदेखील मतदानप्रक्रिया आणि रमजान पर्वचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. नाशिक, मुंबईसह राज्यात रमजान पर्वच्या आठवडाभर अगोदर मतदानप्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे वाद उद्भवण्याचा किंवा कुठलाही अडसर निर्माण होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले.रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल, असे मत स्थानिक धर्मगुरू व उलेमांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.---या जिल्ह्यांत या तारखांना लोकसभेचे मतदानपहिला टप्पा- ११ एप्रिल- ७ मतदारसंघवर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीमदुसरा टप्पा- १८ एप्रिल- १० मतदारसंघबुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर.तिसरा टप्पा- २३ एप्रिल- १४ मतदारसंघजळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.चौथा टप्पा- २९ एप्रिल- १७ मतदारसंघनंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग