शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:23 IST

गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या अल्प पावसाने तग धरुन असलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर समाधानचे वातावरण आहे.

वडनेर : गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या अल्प पावसाने तग धरुन असलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर समाधानचे वातावरण आहे.तालुक्यातील काटवन परिसरात मोठ्या प्रमाणावर मका लागवड केली जाते. पावसाळ्यातील हुकमी पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते परंतु पावसाने दडी मारल्याने परिसरात चिंतेचे सावट पसरले होते. तग धरुन बसलेल्या पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले असले तरी उत्पादनात घट होणार आहे.गेल्या दीड महिन्यापूर्वी पाऊस नसल्याने शेतमजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नव्हता. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरूवात केली होती. पावसाअभावी कोरडवाहू शेती धोक्यात सापडली होती.सुमारे एक ते दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पाऊस सक्रीय झाल्याने तग धरुन असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. वडनेर परिसरात यंदा पावसाची सुरूवात चांगल्या प्रमाणात झाली होती. परंतु मध्यंतरी पावसाने ओढ दिली. वडनेर परिसरात प्रामुख्याने मका, बाजरी पिकांची पेरणी केली जाते. चांगला पाऊस होऊन पिके चांगली येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस