शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अपघातातील जखमी कोल्ह्याला जीवदान; पुण्याच्या रेस्क्यू केंद्रात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:11 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो.

ठळक मुद्देमध्यरात्री दाखविली तत्परताप्रकृतीत सुधारणा; लवकरच मुक्तता

नाशिक : शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास बेफामपणे वाहने चालविणाऱ्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडतात. यास वन्यप्राणीदेखील अपवाद नाही, अशाचप्रकारे एका भरधाव वाहनाच्या धडकेत पेगलवाडी फाट्यावर अंदाजे दोन वर्षांचा कोल्हा (मादी) गंभीर जखमी झाला होता. याबाबत माहिती मिळताच वन्यजीवप्रेमी व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून धाव घेत जखमी कोल्ह्याला 'रेस्क्यू' केले. वन अधिकारी, कर्मचारी यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे वेळेवर प्रथमोपचार मिळाल्याने कोल्ह्याला जीवदान लाभले.नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात हे वन्यप्राणी आपली जागा सोडून भटकंती करतात. गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास पेगलवाडी फाट्याजवळ त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुलावरुन जाणाऱ्या कोल्ह्याला एका भरधाव वाहनाने धडक दिली. धडकेत कोल्ह्याच्या जबड्याला जबर मार बसला आणि त्याचे दातही तुटले. कोल्हा रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत कठड्यालगत पडलेला होता. याबाबतची माहिती नाशिक वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वन्यजीवप्रेमी वैभव भोगले आदींनी तत्काळ घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. कोल्ह्याची अवस्था बघून तातडीने त्यास जागेवरच प्रथमोपचार दिले आणि उंटवाडी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात हलविले.प्रकृतीत सुधारणा; लवकरच मुक्ततासकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोल्ह्याची तपासणी करुन औषधोपचार दिले. यानंतर कोल्ह्याला वनखात्याच्या वाहनातून पुण्याच्या बावधान येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या रिहॅबिटेशन केंद्रात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. तेथे मागील दोन दिवसांपासून उपचार सुरु असून कोल्ह्याची प्रकृतीत मोठी सुधारणा झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याचे भदाणे यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकwildlifeवन्यजीवAccidentअपघात