शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कर्जफेडीकडे पाठ

By admin | Updated: March 27, 2017 00:52 IST

सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही.

सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही. शेती आणि शेतीवर आधारित सर्व कर्ज मार्च महिन्यात भरावे लागते. शेतीचे उत्पन्न झाले असो अथवा नसो पण मार्च महिन्यात सोसायटीचे कर्ज फेडावेच लागते. प्रत्येक वर्षी मार्च महिना आला की शेतीवरील पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जफेड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची; पण सलग तीन वर्षे दुष्काळी स्थितीमुळे आणि यंदा शेतमालाला असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी संपूर्ण डभघाईस गेल्यामुळे कर्जफेडीकडे त्याने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अनेक मोठ्या सहकारी सोसायटी आणि जिल्हा बँकेच्या शाखांना दिलेले वसुलीचे टार्गेट आता कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाचे शासन स्तरावरील निर्यातीचे कुचकामी धोरण असल्याने शेती सतत तोट्यात आहे, तसेच खत ,बी बीयाने यांच्या वाढत्या किंमती, शेतीसाठी लागणारी मजुरी, बदलते वातावरण, अनियमित पाऊस, यामुळे शेती वर्षानुवर्षे तोट्यात असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कुटुंब कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण , मुलींचे लग्न कसे करावे, असे अनेक कौटुंबिक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे राहिले आहे अशा परिस्थितीत कर्ज कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारचे अर्थ संकल्प अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहील्या दिवसापासून विरोधी पक्षांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेतकरी आणि कर्जमाफी या प्रमुख मुद्यांनी संपूर्ण अधिवेशन गाजले यामुळे ठिकठिकाणी शेतकरी वेगवेगळे आंदोलने करत आहेत. विरोधी पक्ष शेतकरी संघर्ष यात्रा काढणार आहे , त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार कर्जमाफी करण्यासाठी अनुकूल आहे मात्र योग्य वेळ येऊन द्यावी लागेल असे वारंवार सांगितले त्यामुळे सरकार आज ना उद्या नक्कीच कर्जमाफी करेल अशी भोळी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.  शिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले असेल त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होतो असा मागील इतिहास आहे त्यामुळे आपण कर्जफेडले तर आपल्याला कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यामुळे कर्जफेडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत नाही.  कर्जफेड करण्यास आज शेतकऱ्यांंची परिस्थिती अनुकूल नाही, काही मोठ्या शेतकऱ्यांची असली तरी कर्जमाफीचा फायदा उचलण्यासाठी शेतकरी कर्ज फेड करत नाही. त्यामुळे सहकारी संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक आणखीच तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचे देखील कर्ज वाढणार आहे, परिणामी शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे कधीतरी कर्जमाफी करण्यास अनुकूल असलेल्या सरकारने तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)