शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

शेतकऱ्यांची कर्जफेडीकडे पाठ

By admin | Updated: March 27, 2017 00:52 IST

सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही.

सायखेडा : शेती आणि शेतीसंदर्भातील मध्य मुदत पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ यंदा मार्च एण्डजवळ आला तरी किंचितही पाहायला मिळत नाही. शेती आणि शेतीवर आधारित सर्व कर्ज मार्च महिन्यात भरावे लागते. शेतीचे उत्पन्न झाले असो अथवा नसो पण मार्च महिन्यात सोसायटीचे कर्ज फेडावेच लागते. प्रत्येक वर्षी मार्च महिना आला की शेतीवरील पीककर्ज आणि मध्यम मुदत कर्जफेड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची; पण सलग तीन वर्षे दुष्काळी स्थितीमुळे आणि यंदा शेतमालाला असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी संपूर्ण डभघाईस गेल्यामुळे कर्जफेडीकडे त्याने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अनेक मोठ्या सहकारी सोसायटी आणि जिल्हा बँकेच्या शाखांना दिलेले वसुलीचे टार्गेट आता कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाचे शासन स्तरावरील निर्यातीचे कुचकामी धोरण असल्याने शेती सतत तोट्यात आहे, तसेच खत ,बी बीयाने यांच्या वाढत्या किंमती, शेतीसाठी लागणारी मजुरी, बदलते वातावरण, अनियमित पाऊस, यामुळे शेती वर्षानुवर्षे तोट्यात असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कुटुंब कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण , मुलींचे लग्न कसे करावे, असे अनेक कौटुंबिक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे राहिले आहे अशा परिस्थितीत कर्ज कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारचे अर्थ संकल्प अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहील्या दिवसापासून विरोधी पक्षांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेतकरी आणि कर्जमाफी या प्रमुख मुद्यांनी संपूर्ण अधिवेशन गाजले यामुळे ठिकठिकाणी शेतकरी वेगवेगळे आंदोलने करत आहेत. विरोधी पक्ष शेतकरी संघर्ष यात्रा काढणार आहे , त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार कर्जमाफी करण्यासाठी अनुकूल आहे मात्र योग्य वेळ येऊन द्यावी लागेल असे वारंवार सांगितले त्यामुळे सरकार आज ना उद्या नक्कीच कर्जमाफी करेल अशी भोळी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.  शिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले असेल त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होतो असा मागील इतिहास आहे त्यामुळे आपण कर्जफेडले तर आपल्याला कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यामुळे कर्जफेडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत नाही.  कर्जफेड करण्यास आज शेतकऱ्यांंची परिस्थिती अनुकूल नाही, काही मोठ्या शेतकऱ्यांची असली तरी कर्जमाफीचा फायदा उचलण्यासाठी शेतकरी कर्ज फेड करत नाही. त्यामुळे सहकारी संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक आणखीच तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचे देखील कर्ज वाढणार आहे, परिणामी शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे कधीतरी कर्जमाफी करण्यास अनुकूल असलेल्या सरकारने तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)