शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:13 AM

स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नायगाव : स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सहचिटणीस हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, संचालक हेमंत नाईक, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, विलास सांगळे, निवृत्त पोलीस अधिकारी भीमराव दराडे, पांडुरंग बोडके व्यासपीठावर उपस्थित होते.  सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले जलसंधारण, पाणी अडावा, पाणी जिरवा व नगर विक साचे नियोजनच निसर्गाचा समतोल राखण्यास यशस्वी मूलमंत्र असल्याचे सांगून ग्रामविकास समितीने हाती घेतलेले ग्रामविकासाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले.  सिन्नरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावताना माणसे जोडण्याची किमया साधून सार्वजनिक हिताच्या केलेल्या कामाचे आज संपूर्ण तालुका फळे चाखत असून, झाडे लावणाऱ्या दिघोळे यांना विसरून चालणार नसल्याचे सांगत असताना दिघोळेंचा संपूर्ण जीवनपट सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केदार यांनी आपल्या भाषणातून मांडला. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, लक्ष्मणराव सांगळे, हेमंत धात्रक आदींची भाषणे झाली.  यावेळी ग्रामविकास समितीचे अशोक बोडके, जयराम गिते, अंकुश गिते, सोमनाथ बोडके, संदीप नागरे, रामचंद्र कापसे, नामदेव कापसे, सीताराम बोडके आदींसह  ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गिते यांनी प्रास्ताविक तर रामदास ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.उगवत्या सूर्याला....ज्या सूर्याच्या सावलीचाही आपल्या हितासाठी उपयोग करून घेण्यासाठी नमस्कार करणारे, तोच सूर्य मात्र मावळतीला जात असताना त्याला विसरणारी संस्कृती आज बघायला मिळत आहे. आज झालेल्या माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या जीवनगौरव समारंभास निमंत्रण देऊनही तालुक्यातील एकही राजकीय पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने हा विषय नायगाव खोºयात चर्चेचा बनला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक