शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:13 AM

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.

येवला : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.  विखरणी-गोरखनगर मार्गावर असलेल्या तलावातील गाळ या योजनेंतर्गत काढण्यात येणार असून या तलावापासून कानडी शिवारातील तलावापर्यंत सर्व बंधाºयातील गाळ काढण्यात येणार आहे. या तलावातील गाळ शेतकºयांनी आपापल्या शेतजमिनीत टाकल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल असे मत यावेळी कृषी अधिकाºयांनी व्यक्त केले.  या योजनेंतर्गत तीन बंधारा  दुरु स्ती कामे मंजूर असून, एक काम पूर्ण झाले आहे. तर इतर दोन कामे लवकरच सुरू होतील यासोबतच बांध बंधिस्तीची कामेही सुरू राहणार आहेत. यापूर्वी गतवर्षी वसंत बंधारा येथील गाळ काढण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या टप्प्याचे काम आता सुरू करण्यात आले असून, ग्रामस्थांनी या बंधाºयातील गाळ स्वखर्चाने वाहून नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पोयट्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली. या कार्यकमप्रसंगी कृषी अधिकारी राहुल शिंदे, संदीप सोनवर, सरपंच रामदास खुरसने, उपसरपंच विठाबाई पगार, दत्तूू बोळीज, प्रकाश पगार, अशोक कोताडे, वाल्मीक शेलार, म्हसू बिडगर, अरूण खरे, बाजीराव शेळके, सुनील जिरे, नवनाथ गोडसे, अरूण ठोंबरे, तुकाराम शेलार, सागर शेलार, संतोष कोकणे आदी उपस्थित होते.  गावाच्या विकासासोबतच सिंचनासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक असल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभाग आणि शासन यांच्या मदतीने गावात जास्तीतजास्त कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याने जास्तीतजास्त शेतकºयांनी या योजनेचा फायदा शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी मोहन शेलार यांनी उपस्थित शेतकºयांना केले.

टॅग्स :Damधरण