शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चा थाटात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:51 IST

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला.

ठळक मुद्देनाशिकचे ई-गर्व्हंनन्स केंद्र देशासाठी ठरणार आदर्शमोबाईलद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची ४३ लाख

नाशिक : वकिलांसह पक्षकारांचाही वेळ व श्रम वाचविण्यासाठी ई- ई-कोर्ट प्रभावी ठरणार आहे. नाशिकचे ई-गर्व्हनन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल, याचा मला विश्वास आहे. लॉकडाऊन काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यायदान शक्य झाले. व्हर्च्युअल कोर्ट लॉकडाऊनमध्येही सुरू होते. त्यामुळेच महाराष्ट्रसह देशभरात हजारो ते लाखो खटल्यांचा निपटारा होऊ शकला आणि बारच्या पाठिंब्याशिवाय न्यायप्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही, याची मला पुर्ण खात्री आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी केले.

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला. यावेळी उद्घाटक म्हणून चंद्रचुड बोलत होते. अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता होते. याप्रसंगी महाराष्ट्रचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे आदिंनी सहभाग घेतला.
यावेळी चंद्रचुड म्हणाले, कोव्हिडने आपल्या सर्वांना खुप काही शिकविले आहे. कोव्हिडमुळे कामाचे स्वरूप जगभरात बदलून गेले. न्यायव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. न्यायव्यवस्थेचे कान, नाक वकिलवर्ग आहे. देशातील पहिले ई-गव्हर्नंस केंद्र संपुर्ण भारतासाठी आदर्श ठरेल, याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.नाशिकला सुरू झालेले ई-गव्हर्नंस सेंटर कोव्हिड-१९च्या संक्रमण काळात नक्कीच गरजेचे होते. लॉकडाऊन काळात न्यायप्रक्रियाही प्रभावित झाली. ई-फायलिंग, व्हिडिओ कॉन्सफरन्सींगद्वारे सुनावणी हे या काळात अधिक लाभदायी ठरले. हे केंद्र नक्कीच यशस्वी होईल, याचा मला विश्वास आहे, असे मत न्यायाधीश दिपंकर दत्ता यांनी यावेळी व्यक्त केले.
आधुनिकतेचा जलद न्यायप्रक्रियेला नक्कीच फायदा होणार आहे. हा न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा आधुनिक बदल असून ती काळाची गरज आहे. या केंद्राचा फायदा महाराष्ट्रसह गोवा राज्यातील १ लाख ७५ हजार वकिलांना होणार असल्याचा विश्वासही अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी व्यक्त केला. ई-कोर्टला खूप पसंती मिळत आहे. मोबाईलद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची ४३ लाख इतकी मोठी आहे. यामध्ये वकिलांसह पक्षकारांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.  प्रास्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. आभार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस