शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चा थाटात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:51 IST

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला.

ठळक मुद्देनाशिकचे ई-गर्व्हंनन्स केंद्र देशासाठी ठरणार आदर्शमोबाईलद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची ४३ लाख

नाशिक : वकिलांसह पक्षकारांचाही वेळ व श्रम वाचविण्यासाठी ई- ई-कोर्ट प्रभावी ठरणार आहे. नाशिकचे ई-गर्व्हनन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल, याचा मला विश्वास आहे. लॉकडाऊन काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यायदान शक्य झाले. व्हर्च्युअल कोर्ट लॉकडाऊनमध्येही सुरू होते. त्यामुळेच महाराष्ट्रसह देशभरात हजारो ते लाखो खटल्यांचा निपटारा होऊ शकला आणि बारच्या पाठिंब्याशिवाय न्यायप्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही, याची मला पुर्ण खात्री आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी केले.

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला. यावेळी उद्घाटक म्हणून चंद्रचुड बोलत होते. अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता होते. याप्रसंगी महाराष्ट्रचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे आदिंनी सहभाग घेतला.
यावेळी चंद्रचुड म्हणाले, कोव्हिडने आपल्या सर्वांना खुप काही शिकविले आहे. कोव्हिडमुळे कामाचे स्वरूप जगभरात बदलून गेले. न्यायव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. न्यायव्यवस्थेचे कान, नाक वकिलवर्ग आहे. देशातील पहिले ई-गव्हर्नंस केंद्र संपुर्ण भारतासाठी आदर्श ठरेल, याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.नाशिकला सुरू झालेले ई-गव्हर्नंस सेंटर कोव्हिड-१९च्या संक्रमण काळात नक्कीच गरजेचे होते. लॉकडाऊन काळात न्यायप्रक्रियाही प्रभावित झाली. ई-फायलिंग, व्हिडिओ कॉन्सफरन्सींगद्वारे सुनावणी हे या काळात अधिक लाभदायी ठरले. हे केंद्र नक्कीच यशस्वी होईल, याचा मला विश्वास आहे, असे मत न्यायाधीश दिपंकर दत्ता यांनी यावेळी व्यक्त केले.
आधुनिकतेचा जलद न्यायप्रक्रियेला नक्कीच फायदा होणार आहे. हा न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा आधुनिक बदल असून ती काळाची गरज आहे. या केंद्राचा फायदा महाराष्ट्रसह गोवा राज्यातील १ लाख ७५ हजार वकिलांना होणार असल्याचा विश्वासही अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी व्यक्त केला. ई-कोर्टला खूप पसंती मिळत आहे. मोबाईलद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची ४३ लाख इतकी मोठी आहे. यामध्ये वकिलांसह पक्षकारांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.  प्रास्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. आभार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस