शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दरेवाडी येथे भूस्खलन झाल्याने संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 01:36 IST

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे नवीन पुनर्वसन वरची दरेवाडी येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्याने रस्त्यावर मातीचा ढिगारा झाला आहे. यामुळे दरेवाडी व काळुस्ते या गावांचा संपर्क तुटला. या रस्त्यावर कायमच भूस्खलन होत असल्याची पुनर्वसन अधिकारी व प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देमुख्य रस्त्यावर मातीचे ढिगारे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे नवीन पुनर्वसन वरची दरेवाडी येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्याने रस्त्यावर मातीचा ढिगारा झाला आहे. यामुळे दरेवाडी व काळुस्ते या गावांचा संपर्क तुटला. या रस्त्यावर कायमच भूस्खलन होत असल्याची पुनर्वसन अधिकारी व प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

भाम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त प्रमाणात वृष्टी होत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांची तारांबळ उडते. या रस्त्यावर मातीचे ढिगारे साचल्याने मोटारसायकल यात अडकून पडल्या आहेत. तसेच पायी चालणेही अवघडच झाले आहे. दरम्यान, या भागातून मजूरवर्ग घोटी व तालुक्यात मोठ्या प्रमाणात येत असतो. मात्र पर्यायी रस्ता नाही व दुचाकीही जाऊ-येऊ शकत नसल्याने अनेक मजुरांना रविवारी घरीच थांबावे लागले.

रस्ता खचल्याचे कळल्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली. या भूस्खलनामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही समाधानाची बाब होय. या प्रकाराबाबत तहसीलदार व जलसंपदा, पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली, कर्मचारी मात्र उपस्थित झाले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने रस्त्यावरील मातीचे ढिगारे बाजूला करण्याची गरज आहे. परंतु रविवार सुट्टीचा दिवस असल्याचे कारण देत हे काम पुढे ढकलण्यात आले. ________

इन्फो

भाम धरणामुळे पुनर्वसन झालेल्या दरेवाडीकडे जाणारा रस्ता हा पावसामुळे नेहमीच खचत असतो, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. याबाबत तालुका प्रशासन, जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस