शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

एसटीपीची भूसंपादन प्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:41 IST

नाशिकरोड : महानगरपालिकेने पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रासाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व्हे नंबर ६३ मधील भूसंपादन प्रक्रिया रद्दबातल ठरविल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा भूसंपादन प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णय : पुन्हा पहिल्यापासून कामकाज करावे लागणार

नाशिकरोड : महानगरपालिकेने पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रासाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व्हे नंबर ६३ मधील भूसंपादन प्रक्रिया रद्दबातल ठरविल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा भूसंपादन प्रक्रिया राबवावी लागणार आहे.उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व न्यायाधीश इकबाल छगला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रासाठी सन २०१४ मध्ये नाशिक महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांना भूसंपादनाचे प्रस्ताव पाठविले होते. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली; मात्र शेतकरी प्रभाकर रामदास बोराडे, हेमंत शिवाजी बोराडे, सुरेश रामचंद्र बोराडे, भिवाजी धुळाजी बोराडे, दीपक कृष्णा बोराडे, प्रकाश बोराडे, तानाजी बोराडे, सुकदेव बोराडे, बाळू बोराडे, देवराम बोराडे, गोपाळा बोराडे, मयूर पोरजे, दत्तू बोराडे व इतर यांनी भूसंपादन विरोधात अ‍ॅड. अनिल आहुजा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्याचे पालन न करताच भूसंपादन केलेले आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून सन २०१४ साली केलेला भूसंपादन प्रस्ताव रद्द करण्यास पात्र आहे असे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर भूसंपादन निवाडा शासनाने मागे घेतला. नवीन भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे संपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत व सर्व तरतुदींची पूर्तता करण्याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. सदर प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने पूर्वी केलेला निवाडा रद्द करण्यात आला.प्रतिज्ञापत्राप्रमाणे सन २०१५ साली तत्कालीन भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी नवीन भूसंपादन कायद्यान्वये नवीन प्रक्रिया सुरू केली; मात्र सदर प्रक्रियादेखील बेकायदेशीर असल्याने संबंधित शेतकºयांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिका प्रलंबित असताना भूसंपादन अधिकारी यांनी निवाडा घोषित करून संपादित जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सदर कब्जाच्या प्रक्रियेमध्ये भूसंपादन अधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी खोटे पंचनामे करून कब्जा घेतल्याचे उच्च न्यायालयात भासविले; मात्र सदरची बाब मान्य करण्यात आली नाही.सन २०१४ साली झालेल्या निवाड्याप्रमाणे शेतकºयांना आठ कोटी रुपये भरपाई रक्कम देय होती; मात्र आता सन २०१७ साली नवीन कायद्यानुसार सदर रक्कम ही सोळा कोटी झाली. सदर निवाडादेखील सर्व्हे नं. ६३ पुरता रद्द झाल्याने आता शासनाला व महानगरपालिकेला तिसºयांदा भूसंपादनाची प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागणार आहे. शेतकºयांच्या बाजूने अ‍ॅड. अनिल आहुजा यांनी बाजू मांडली.खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेनवीन भूसंपादन प्रक्रियेमध्ये कलम११ च्या अधिसूचनेनंतर कलम १९ ची अधिसूचना १२ महिन्याच्या आत प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना तशी कुठलीही कार्यवाही भूसंपादन अधिकारी यांनी केली नाही. याउलट भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांनी तलाठी शिंदे यांना हाताशी धरून वर नमूद अधिसूचनेच्या प्रसिद्धीबाबत खोटेनाटे कागदपत्र तयार करून खोटे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले. सदरची बाबदेखील न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. दोन्ही पक्षांना ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने संबंधित अधिकारी वासंती माळी यांच्या विरुद्ध ताशेरे ओढत शासनाने त्यांच्यावर असलेली जबाबदारी योग्य व कायदेशीररीत्या पार पाडलेली नाही व भूसंपादनाची अंतिम अधिसूचना मुदतीत न काढल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया रद्द केली.

टॅग्स :Courtन्यायालय