शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:27 IST

नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे.

ठळक मुद्दे नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द एक जागरूक व सुजाण नागरिकाची भूमिका पार पाडण्याची वेळएसटीला ३१ मार्चपर्यंत ‘ब्रेक’ लागला आहे

नाशिक : ‘कोरोना’चा आघात केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत आहे; मात्र या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार-१ला ६५ लाखांच्या उत्पन्नावर या आठवडाभरात पाणी सोडावे लागले आहे. एकूणच एसटी कोरोनामुक्तीच्या मार्गावर सध्या धावत आहे.‘कोरोना’मुळे गेल्या आठवडाभरात नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे एसटी प्रशानाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नाशिक आगार एकमधून धावणाºया अनेक बसेसची चाके आठवडाभरापासून थबकली आहेत. रविवारी (दि.२२) झालेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये एकही बस रस्त्यावर आली नव्हती. त्यामुळे एसटी नाशिक विभागाला एकाच दिवशी २२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी आदेश लागू केले. तसेच जिल्हाबंदी केल्यामुळे आता एसटीला ३१ मार्चपर्यंत ‘ब्रेक’ लागला आहे. लालपरी कुठल्याही गावाच्या वेशीवर पोहचणार नाही. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतचा राज्याचा प्रवास बंद झाला आहे. एकूणच कारोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एसटीदेखील आपआपल्या ‘घरात’ थांबली असून, नागरिकांनीसुद्धा आता आपल्या घरातच थांबणे अवघ्या समाजाच्या हिताचे ठरणार आहे. सरकार व प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सर्व सूचनांचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आपण एक जागरूक व सुजाण नागरिकाची भूमिका पार पाडण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस