शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

मजूर परतले, पाऊसही थांबल्याने कामाला ‘समृद्धी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 11:17 PM

नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देअडचण दूर: इगतपुरी बोगद्याचे काम युद्धपातळीवर

नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.नाशिक जिल्'ातील सिन्नर आणि इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी जवळपास भुसंपादन पुर्ण करण्यात आले असून उर्वरित भुसंपदानाची प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांशाी चर्चा केली जात आहे. भुसंपादनाची कोणतीही अडचण नसून शेतकरी देखील सहकार्य करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी काम सुरू आहे अशा ठिकाच्या कामाला वेग येऊ लागला आहे. सिन्नरमधून जाणाºया मार्गाचे बºयापैकी काम झाले आहे. सुमारे ३७ ते ३८ टक्के कामकाज झालेले आहे. इगतपुरी मधून जाणाºया मार्गावर असलेले दोन पूल तसेच भुयारी मार्ग यामुळे येथील कामाला प्राधान्य दिले जात आहे.पावसाळ्यात इगतपुरीत पावसाचा जोर असल्यामुळे कामकाजाला अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आठे ते दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी काम बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. अनेकदा पावसामुळे कामकाजात खंड येत असतांनाच कोरानाच्या फटका या कामाला बसला. या कामावरील मजूर गावी परतल्याने कामावºया बºयापैकी परिणाम झाला. उरलेल्या मनुष्यबळावर काम सुरू ठेवºयात आले होते. त्यातही अधून मधून पावसाचा फटका हा बसत होता.आता मात्र परिस्थितीत मोठा बदल झाला असून कामकाजाला गती आलेली आहे. गावी गेलेले मजूर बºयापैकी कामावर परतले आहेत तर पावसाचा जोर देखील कमी झाल्याने कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. पाऊस परतलीला लागल्यामुळे कामकाजात अधिक गतीमानता येईल असे देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.नाशिक जिल्'ात या कामाचे तीन टप्पे आहेत. पावसामुळे या कामावर काहीसा परिणाम झाला. पावसामुळे कामे संथ गतीने सुरू होती तर नंतरच्या काळात मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. मजूरांची संख्या कमी असली तरी पावसाळ्यात देखील असलेल्या मनुष्यबळावर कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. या कामांसाठी मंजुर झालेल्या निधीनुसार या कामकाज झालेले आहे. टप्पा १३ आणि १४ साठी मिळालेल्या निधीनुूसार कामकाज २० टक्केच्या पुढे गेलेले आहे तर सिन्नर मधील कामकाज हे ३७ टक्के झालेले आहे. निधीचा पुढचा टप्पा लवकरच प्राप्त होणार असल्याने कामकाला गती दिली जाणार आहे

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार