शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

भारतीय कृषिमालावर कुवेतची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:47 AM

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.

ठळक मुद्देकांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.सदरचा निपाह हा रोग केरळच्या ठरावीक जिल्ह्यात व विशिष्ट भाजीपाला व फळांवर आहे. कांदा हा महाराष्ट्राच्या मातीत पिकतो. त्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही. असे निर्यातदार संघटनेच्या वतीने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर खासदार राजू शेट्टीव सदाभाऊ खोत यांनी थेट दिल्ली स्थित केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भेटून त्यावर तात्काळ मार्ग काढू असे आश्वासन दिले.निपाह हा व्हायरस वाटवाघळामुळे फळांवर आणि फळातून माणसात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजीपाला आणि फळांवर कुवेतने बंदी घातली आहे. याचा निर्यातीवर परिणाम होत असून शासनाने निपाहच्या प्रतिबंधाबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. शेतमालाची निर्यात बंद झाली तर शेती व शेतकरी अडचणीत येतील असेही बोलले जात आहे.केरळच्या ठरावीक जागी सिमित असणाºया निपाह विषाणूच्या भीतीने कुवेतने कांदा व भाजीपाल्याची कोंडी केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुवेतप्रमाणे अन्य देशदेखील भारताच्या भाजीपाला, कांदा यावर बंदी घालू शकतील. केंद्र व राज्य शासनाने याबाबत गंभीर होऊन परिस्थिती हाताळावी.- नंदकुमार आट्टल,कांदा व्यापारी, येवला बंदीच्या संकटामुळे निर्यातदार धास्तावले असून, कांद्याचे भावदेखील एका कंटेनरला लाख रु पयांनी कमी झाले आहेत. कुवेतची निर्यात चालू असताना कांद्याला ८०० ते १००० रु पयापर्यंत भाव होते. हा माल आता अन्य देशात वळवावा लागत आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा परिणाम म्हणून कांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.- संतोष आट्टल, राज्य निर्यातदार संघटना प्रतिनिधी, येवला