शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

थंडीत कुडकुडत आदिवासींचा रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:10 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले.

चांदवड : आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले.वनजमिनी नावावर कराव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी व लाइटसाठी ना हरकत दाखला ताबडतोब मिळावा, बिगर आदिवासींना ७५वर्षाचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरावा व कायद्यानुसार तो दावा पात्र करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १ वाजेपासून वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मनमाड विभागाच्या पोलीस उपअधीक्षक रागसुधा आर. सहायक वनसरंक्षक राजेंद्र कापसे ,चांदवडचे वनक्षेत्रपाल संजय पवार, तहसीलदार डॉ.शरद मंडलीक, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत दि. ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी डॉ. शिवबाला व आंदोलनकर्त्याचे प्रमुख आमदार जे.पी. गावित, जिल्हा सचिव सुनील मालुसरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर २९ तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दि. ३ जानेवारीला मार्ग न निघाल्यास जिल्हाभरातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपसरंक्षक डॉ.शिवबाला यांच्या कार्यालयावर मुक्काम ठोकतील असा इशारा यावेळी जिल्हा सचिव सुनील मालुसरे, जिल्हा सदस्य कॉ. हनुमंता गुंजाळ, रमेश चौधरी यांनी दिला. आंदोलनातील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी व विजेसाठी ना हरकत दाखला देण्याचे अधिकार मनमाड येथील सहायक वनसरंक्षक अधिकारी राजेंद्र कापसे व चांदवड वनक्षेत्रपाल अधिकारी संजय पवार यांना नसल्याने आंदोलनकर्त्यांचा मुक्काम २९ तासापर्यंत वाढल्याचे ते म्हणाले.उनसंरक्षक डॉ. शिवबाला यांची वाट पाहूनही ते आले नाही. दरम्यान, प्रांताधिकारी भंडारे यांनी जिल्हाधिकारी, उपसरंक्षक अधिकारी डॉ. शिवबाला, आमदार जे.पी.गावित यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा सचिव सुनील मालुसरे, कॉ. हनुमंता गुंजाळ व पदाधिकाºयांचे बोलणे करुन दिले व लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.कॉ.हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, सुकदेव केदारे, राजाराम ठाकरे, दत्तू भोये, जयराम गावित, दौलत वटाणे, हनुमान मोरे, शंकर गवळी, शिवाजी सोनवणे, सुरेश पवार, साहेबराव गांगुर्डे यांच्यासह सुमारे सहाशे महिला व पुरुषांनी या आंदोलनात सहभाग घेतला. चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडनेरभैरवचे सहायक निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून जादा पोलीस फौज मागविण्यात आली होती.आंदोलनकर्त्यांना जेवणच्गुरुवारी सर्वच अधिकाºयांनी रात्री उशिरापर्यंत अनेक तडजोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र किसान सभेच्या महिला व पुरुषांनी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करत वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या आवारात रात्रभर थंडीत मुक्काम ठोकला. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत याप्रश्नी मार्ग निघेल असा अंदाज होता. यासाठी आमदार जे.पी. गावित, उपवनसरंक्षक डॉ. शिवबाला यांची आंदोलनकर्ते वाट पाहत होते. दरम्यान, वनक्षेत्रपाल आवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुमारे सहाशे आंदोलक पुरुष-महिलांना जेवणही देण्यात आले.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चNashikनाशिकforestजंगल