शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत कुडकुडत आदिवासींचा रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:10 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले.

चांदवड : आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले.वनजमिनी नावावर कराव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी व लाइटसाठी ना हरकत दाखला ताबडतोब मिळावा, बिगर आदिवासींना ७५वर्षाचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरावा व कायद्यानुसार तो दावा पात्र करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १ वाजेपासून वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मनमाड विभागाच्या पोलीस उपअधीक्षक रागसुधा आर. सहायक वनसरंक्षक राजेंद्र कापसे ,चांदवडचे वनक्षेत्रपाल संजय पवार, तहसीलदार डॉ.शरद मंडलीक, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत दि. ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी डॉ. शिवबाला व आंदोलनकर्त्याचे प्रमुख आमदार जे.पी. गावित, जिल्हा सचिव सुनील मालुसरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर २९ तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दि. ३ जानेवारीला मार्ग न निघाल्यास जिल्हाभरातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपसरंक्षक डॉ.शिवबाला यांच्या कार्यालयावर मुक्काम ठोकतील असा इशारा यावेळी जिल्हा सचिव सुनील मालुसरे, जिल्हा सदस्य कॉ. हनुमंता गुंजाळ, रमेश चौधरी यांनी दिला. आंदोलनातील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी व विजेसाठी ना हरकत दाखला देण्याचे अधिकार मनमाड येथील सहायक वनसरंक्षक अधिकारी राजेंद्र कापसे व चांदवड वनक्षेत्रपाल अधिकारी संजय पवार यांना नसल्याने आंदोलनकर्त्यांचा मुक्काम २९ तासापर्यंत वाढल्याचे ते म्हणाले.उनसंरक्षक डॉ. शिवबाला यांची वाट पाहूनही ते आले नाही. दरम्यान, प्रांताधिकारी भंडारे यांनी जिल्हाधिकारी, उपसरंक्षक अधिकारी डॉ. शिवबाला, आमदार जे.पी.गावित यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा सचिव सुनील मालुसरे, कॉ. हनुमंता गुंजाळ व पदाधिकाºयांचे बोलणे करुन दिले व लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.कॉ.हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, सुकदेव केदारे, राजाराम ठाकरे, दत्तू भोये, जयराम गावित, दौलत वटाणे, हनुमान मोरे, शंकर गवळी, शिवाजी सोनवणे, सुरेश पवार, साहेबराव गांगुर्डे यांच्यासह सुमारे सहाशे महिला व पुरुषांनी या आंदोलनात सहभाग घेतला. चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडनेरभैरवचे सहायक निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून जादा पोलीस फौज मागविण्यात आली होती.आंदोलनकर्त्यांना जेवणच्गुरुवारी सर्वच अधिकाºयांनी रात्री उशिरापर्यंत अनेक तडजोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र किसान सभेच्या महिला व पुरुषांनी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करत वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या आवारात रात्रभर थंडीत मुक्काम ठोकला. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत याप्रश्नी मार्ग निघेल असा अंदाज होता. यासाठी आमदार जे.पी. गावित, उपवनसरंक्षक डॉ. शिवबाला यांची आंदोलनकर्ते वाट पाहत होते. दरम्यान, वनक्षेत्रपाल आवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुमारे सहाशे आंदोलक पुरुष-महिलांना जेवणही देण्यात आले.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चNashikनाशिकforestजंगल