शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमहोत्सव : हषवर्धन पाटील यांचे प्रतिपादन

By admin | Updated: January 24, 2016 22:43 IST

सहकारातून नैसर्गिक शेतीला गती

नाशिक : श्री स्वामी समर्थ अध्यात्म कें द्राने संस्कृती संस्कार जोपासण्याची परंपरा कायम ठेवली असून, आता अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आणि शेतीला पाठबळ देण्यासाठी सेवामार्गातील पुढाकार घेतल्याने कृषी विकास साधला जाऊन शेतकऱ्यांना आत्मिक बळ मिळेल. अल्प खर्चात चांगले उत्पन्न देणाऱ्या नैसर्गिक शेतीकडे शेतक ऱ्यांचा कल वाढलेला असल्याने सहकार क्षेत्रातून शेतीचे मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास नैसर्गिक शेतीला गती मिळेल, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी विक ास व संशोधन चारिटेबल ट्रस्ट व शासनातर्फे आयोजित पाच दिवसीय जागतिक कृषिमहोत्सवात रविवारी (दि. २४) नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर अण्णासाहेब मोरे, नैसर्गिक शेती अभ्यासक जितेंद्र कुटमुतिया विलास सनेर उपस्थित होते.अविरत निसर्गाच्या सानिध्यात समाजाला अन्नधान्य देणारा शेतकरी निसर्गाचा खरा उपासक आहे. मात्र तरीही त्याला नैसर्गिक शेतीविषयी संपूर्ण माहिती नाही. त्यामुळे निसर्ग शेतीची शेतकऱ्यांना प्राथमिक माहिती देण्याची गरज असून, पंचमहाभुतांवर आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असल्याचे कर्नाटकचे नैसर्गिक शेतीतज्ज्ञ सुरेश देसाई यांनी सांगितले. गुजरातचे नैसगिक शेतीतज्ज्ञ नरेश सावे म्हणाले, रासायनिक सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती असे शेतीचे तीन प्रकार असून, सध्या रासायनिक शेतीवर भर दिला जातो. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. तुलनेत नैसर्गिक शेती ऊन, वारा, पाणी, जमीन या घटकांवर आधारित असून, या पद्धतीत शेती संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने पीक चांगले येते आणि हे उत्पादन आयोग्यालाही पोषक असते. तत्पूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते नैसर्गिक कृषी पुरस्कार कुरेशी शेख व ओमप्रकाश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शेती अभ्यासक, शेतकरी, श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे सेवेकरी आणि नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)