शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

किकवी धरण  : सिंचन घोटाळ्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 01:10 IST

नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांच्या निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण बांधण्यास मान्यता देण्यात आली आणि २०२१ पासून या धरणातून नाशिक शहराला वाढीव पाणी देण्यास मान्यता देण्यात आली, मात्र सिंचन घोटाळ्यानंतर या धरणाच्या निविदा विद्यमान भाजपा सरकारने रद्द केल्या.

नाशिक : नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांच्या निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण बांधण्यास मान्यता देण्यात आली आणि २०२१ पासून या धरणातून नाशिक शहराला वाढीव पाणी देण्यास मान्यता देण्यात आली, मात्र सिंचन घोटाळ्यानंतर या धरणाच्या निविदा विद्यमान भाजपा सरकारने रद्द केल्या. त्यामुळे आता २०२१ पासून कसे काय पाणी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाशिक शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने २००७ मध्ये गंगापूर धरणाला आणखी एका धरणातून पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत हे नियोजन केले. केंद्र सरकारच्या योजनेत नाशिकला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकारची हमी आवश्यक असल्याने त्यावेळी किकवी धरणातून पाणी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार २० आॅक्टोबर २००७ मध्ये मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला हे धरण नाशिक महापालिकेने बांधण्याचे ठरविण्यात आले. परंतु नंतर महापालिकेने नकार दिला. त्यानंतर राज्य शासनाने हे धरण बांधण्याचे ठरविले. त्यासाठी निविदाही मागवल्या. परंतु नंतर सिंचन घोटाळा चर्चेत आला. पुढे राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर किकवी धरण बांधण्याच्या निविदाही रद्द करण्यात आल्या. परंतु त्याची पुुढील कार्यवाही सरकारने केलीच नाही. त्यामुळे आता राज्य सरकारनेच दिलेल्या मंजुरीनुसार नाशिक महापालिकेला २०२१ पासून या धरणातून ११६२ दशलक्ष घनफूट पाणी देणे बंधनकारक आहे, परंतु विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी धरणासाठी निविदा मागवल्या नाही की धरणाचे कामही सुरू झालेले नाही. दुसरीकडे पूर्वी फक्त अहमदनगरला पाणी देण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाची मेंढीगिरी समितीमुळे व्याप्ती वाढली असून, मराठवाड्यासाठीदेखील पाणी द्यावे लागत असल्याने महापालिकाही चिंतेत आहे.बेत रहित : पालिकेकडे कोट्यवधींची मागणीमहापालिकेने धरण बांधण्याची तयारी केली तेव्हा मोठा गवगवा झाला होता. मात्र १८०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे धरण बांधण्यासाठी वनक्षेत्र बाधीत होणार असल्याने त्याची भरपाई द्यावी लागणार होती. तसेच धरण बांधण्यासाठी विलंब झाल्यास खर्चदेखील वाढणार होता. म्हणून महापालिकेने बेत रहित केला.महापालिकेने धरण बांधले नाही की धरणाचे पाणीही मिळाले नाही मात्र सिंचन क्षेत्र बाधीत होत असल्याने महापालिकेला भरपाईच्या नोटिसा मात्र दिल्या जात असून, कोट्यवधी रुपयांची मागणीही केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीDamधरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका