शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

खिलार गाय-बैल नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 2:59 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पुर्वी गोठ्यामध्ये खिलार गाय-बैल मोठ्या प्रमाणावर असत. परंतु शासनाच्या बैल गाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण भागातील गोठ्यातील खिलार गाय-बैल आता नामशेष झाले आहे.

ठळक मुद्देलखमापूर : परराज्यातील गिर गायीला शेतकऱ्यांची विशेष पसंती

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पुर्वी गोठ्यामध्ये खिलार गाय-बैल मोठ्या प्रमाणावर असत. परंतु शासनाच्या बैल गाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण भागातील गोठ्यातील खिलार गाय-बैल आता नामशेष झाले आहे.राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी खिलार प्रवर्गातील गाय-बैल सध्या नामशेष अथवा दुर्मिळ झाल्याने ग्रामीण भागातील गोठ्यातील ते वैभव आता ओसरु लागले आहे.पुर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी वर्गाच्या गाईच्या गोठ्यात खिलार गाय असायची. खिलार गाय दुध कमी देत असली तरी शरीरयेष्ठीने अत्यंत चपळ व दिसायला सुंदर असणारी या प्रवर्गातील गाय व बैल माणसांच्या मनाला मोहिनी घालतात. खिलार गायीचे दुध दोन प्रकारात मोडते.तल्लख बुद्धी व निरोगी शरीरांसाठी अतिशय उत्कृष्ट पोषणमुल्य असलेले हे दुध आज दुर्मिळ होत चालले आहे.देशात देशी गायीच्या दुधाबाबत जागरूकता दिवसेंदिवस वाढत असुनही खिलारच्या दुधवाढीबाबत अनेक वर्षापासुन काहीच प्रयत्न झालेले दिसत नाही. यांचा परिणाम म्हणून शेजारील राज्यांतुन गिर गायीची जाहिरात होऊन अशा स्वरूपांच्या गायी सध्या महाराष्ट्रांच्या ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी करतांना दिसत आहे.त्यामध्येही जातीवंत गिर गाय पाहायला मिळत नाही. त्यात काही प्रमाणात संकरीत प्रमाण आढळून येत आहे. त्या गाई त्या भागात कमी किंमतीत विकल्या जातात. म्हणून तिची जाहिरात करून आपल्याकडे गीर गाय रूपाने जास्त किंमतीत विकल्या जात आहे.महाराष्ट्रातील खिलार गायीच्या बाबतीत असा प्रयत्न कोणी करतांना दिसत नाही. म्हणून महाराष्ट्रातील खिलार प्रवर्गातील गाय आजअखेरीच्या घटका मोजत आहे.खिलार गायीपासुन तयार होणारे बैल अतिशय रूबाबदार व चपळ समजले जातात. खिलार जातीचे मुळ कर्नाटकांच्या हल्लीकर जातीमध्ये सापडते. असे जाणकार शेतकरी वर्गातुन बोलले जाते.देशी खिलार गायीच्या वासरांमध्ये बैल असल्यास त्यांचा वापर शेती व बैलगाडा शर्यतीसाठी गेला जातो. खिलार गायीच्या वासरांला पंचवीस हजार ते दीड लाख रुपयां पर्यंत किंमत मोजावी लागत आहे. परंतु आता शेती यांत्रिकीकरणांवर केली जाते, व बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे खिलार बैल खरेदीला बहुतांशी शेतकरी वर्गाने राम राम ठोकला आहे.

(२९ लखमापूर १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी