शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

पावसाच्या ओढीमुळे खरीप हंगाम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:50 PM

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात बळीराजा चिंतित

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे.जून महिना सुरू झाला आणि पावसाने हजेरी लावली होती. पाऊस वेळेवर दाखल झाल्याचा आनंद शेतकऱ्यांना झाला मात्र हा आनंद फार दिवस टिकला नाही, केवळ पाच दिवस जोरदार पाऊस बरसला आणि पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती झालेल्या जमिनीत बी पेरण्याची कामे शेतकऱ्यांना थांबवावी लागली. जमिनीत वापसा झाली; पण पाऊस पडत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी थांबवावी लागली.

या हंगामात टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखे नगदी पिके घेतली जातात. चार पैसे मिळाले तर पुढील हंगामातील पिकांना भांडवल उभे करता येते मात्र पाऊस नसल्याने नगदी पिकांची लागवड थांबली आहे. रोपे तयार असूनही पाणी नसल्याने पीकलागवड करता येत नाही.मागील वर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस पडला आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यात सगळीकडे चांगला पाऊस पडला होता. पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड वेळेत झाली होती. यंदा मात्र निम्मादेखील पाऊस पडला नसल्याने पेरणी करता येत नाही. अशा परिस्थिती पेरणी केली तर ती वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत.जून महिन्यात पावसाला जोरात सुरुवात झाल्याने यंदा पाऊस वेळेवर पडेल अशी अपेक्षा होती. पण अवघ्या चार दिवसात पाऊस थांबला आणि मशागत करून ठेवलेल्या जमिनीवरील पेरणी थांबवली. नगदी पिकांची लागवड करायचा हंगाम असलातरी पाऊस पडत नसल्याने पिकांची लागवड झालेली नाही. खरीप हंगाम लांबला तर वर्षातील सर्व पिके उशिरा येऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे.-दत्तू भुसारे, शेतकरी, भुसे 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस