शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कळवणच्याआठ प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:18 PM

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

ठळक मुद्देपाझर तलाव कोरडे भूजल पातळी घसरली; पाणीबाणीची स्थिती

मनोज देवरे । लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे.पुनंद प्रकल्पातील पाणी थेट मालेगाव तालुक्यातील टेहरेगावापर्यंत पोहोचविण्यात आल्याने पुनंद प्रकल्पात केवळ १०८ दशलक्ष घनफूट इतका अल्पपाणीसाठा शिल्लक आहे. मळगाव (चिंचपाडा), भेगू, धनोली, जामलेवणी लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक असून, नांदुरी, ओतूर, गोबापूर, मार्कंडपिंप्री, धार्डेदिगर, बोरदैवत, भांडणे, खिराड लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला असून, तालुक्यातील भूजल पातळीदेखील खाली गेल्याने कधी नव्हे इतकी भीषण परिस्थिती कळवण तालुक्यात निर्माण झाली आहे. काही दिवसात पाऊस बरसला नाही तर तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल.कळवण तालुक्यात दोन मोठे धरणे व ११ मध्यम प्रकल्प आहेत, त्यांची एकूण साठवण क्षमता ५२०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला १५ जून २०१९ पर्यंत केवळ २४५ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ४.७१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मळगाव (चिंचपाडा) लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ९२.६६ दशलक्ष घनफूट असून, आजफक्त ३.५ दशलक्ष घनफूट (२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे, तर भेगू लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ९७.६७ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजमितीस ३६.९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.पुनंद परिसरात पाणीटंचाईपुनंद प्रकल्प परिसरातील बंधारपाडा, उंबरगव्हाण, शिरसापाडा, उंबºयामाळ, जांभाळ, महाल, उंबरदे, चोळीचा माळ, औत्यापाणी, धुमंदर, खळीचापाडा, गढीचा पाडा, मोºयाहूड या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असून, शेजारील गुजरात राज्यात पाच किमी पायपीट करून पाणी आणून आदिवासी बांधवांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याचा आसरा घेऊन दिवस काढले जात आहे.पुनंद धरणाखालील सुपले , शेरी, भैताणे, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याणे, गणोरे, सुळे, लखानी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावामध्ये पाणीटंचाई जाणवते. मालेगावसाठी पुनंदमधून पाणी सोडल्यानंतर या भागातील जनतेला दिलासा मिळाला आहे. सध्या अल्प साठा असल्याने भविष्यात या भागाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.लाखो लिटर पाण्याची वाहतूकशासनस्तरावर कळवण तालुका टँकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कळवण तालुक्यातील पुनंदनगर व कातळगाव येथे सध्या टँकर सुरू असून, खांडवीपाडा, जिरवाडे (ओ.), ओतूर, दह्याणे (ओ.), आठंबे, सादडविहीर, भेंडी येथे पाणीटंचाई असल्यामुळे टँकरची सुरू करण्याची नामुष्की आली आहे. ओतूर परिसरात ओतूर, कळवण खुर्द, कुंडाणे, शिरसमणी भागातील विहिरी कोरड्याठाक पडल्याने या भागातील फळबागा व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर धावत आहे.चणकापूर धरणातील मोठा साठा मालेगावसाठी आरक्षित असतो. झालेला पाऊस आणि आरक्षित पाणी याव्यतिरिक्त जे पाणी शिल्लक राहू शकते त्याचा अंदाज करून पाणी आवर्तन दिले जाते. कळवण, बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून आहे. पुनंद व चणकापूरमधून सध्या पाणी सोडल्याने पाण्याची तहान भागली आहे. चणकापूरमधील पाणीसाठा कमी झाल्यास पुनंद प्रकल्पातून पाणी घेऊन पाणी सोडले जाते. तत्कालीन परिस्थितीनुसार चणकापूरचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आज पाण्याची मागणी वाढली आहे.सर्वच क्षेत्रात वाढ झाल्याने पाणी कमी पडू लागले आहे. आज मात्र चणकापूर धरण कोरडेठाक झाले असून, पुनंदमध्ये जेमतेम साठा आहे.धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता १७.५४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आज २१.०७ दशलक्ष घनफूट (१४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.तर जामलेवणी लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ६२.८८ दशलक्ष घनफूट असून, आज ११.२२ दशलक्ष घनफूट (१८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :NashikनाशिकIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प