शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरची शेकडो टुर्स रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:56 IST

नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून चालणाºया अर्थकारणामुळे दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेदेखील पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देपर्यटनावर परिणाम : व्यावसायिक पाठ फिरवण्याच्या तयारीत

संजय पाठक ।नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून चालणाºया अर्थकारणामुळे दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेदेखील पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे जाणाºया पर्यटकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. मार्चपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. केवळ पर्यटनाबरोबरच आता हनिमून पॅकेजेसदेखील सुरू असतात. परंतु दहशतवादी घटना वाढत चालल्या असून, त्यातच पुलवामामध्ये मोठा हल्ला झाल्यानंतर पर्यटनक्षेत्र हादरले आहे. बहुतांशी पॅकेजेस पर्यटकांनीच रद्द केले असून, टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यादेखील सहली रद्द करीत आहेत. देशावर इतका मोठा हल्ला होत असेल तर तेथेच पर्यटनासाठी जाण्याची आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असे टुर्स कंपन्यांनी सांगितले. (पान ७ वर)जम्मू-काश्मीरला पर्याय म्हणून हिमाचल प्रदेश, सीमला, उटी, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटकांना पाठविले जात असून, हा भाग त्या तुलनेत सुरक्षित असल्याने पर्यटकांनाही त्याच पॅकेजमध्ये कमी-अधिक दर करून जाण्यास तयार होत आहेत. पर्यटनच थांबल्याने त्याचा मोठा फटका काश्मिरी नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.मुंबईतून अनेक टुर्स व्यावसायिकांनी काश्मीरच्या सहली रद्द केल्या आहेत. माझ्याकडे हनिमून कपलसह तीन अलीकडेच नोंदविल्या गेलेल्या सहली रद्द झाल्या आहे. पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यामुळे ते टुर रद्द करीत आहेत. त्याचप्रमाणे टुर्स व्यावसायिकांकडे कोणी हट्ट केल्यास संबंधितांना जोखमीवर जावे लागेल, असेही सांगत आहेत. कारण पर्यटक अडकल्यास त्यांना परत आणणे ही फार मोठी जोखीम आहे.- दीपाली वागळे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, मुंबईपर्यटनातून मिळणारा पैसा कश्मीरच्या विकासापेक्षा दहशतवाद्यांना मदतीसाठी होत असल्याची सध्या वॉट््सअ‍ॅप चर्चा सुरू असून, त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी यापुढे काश्मीरला टुर्स नेऊच नये, असे आवाहनदेखील सुरू केले आहे. त्यामुळे व्यावसायिकदेखील स्वेच्छेने टुर्स रद्द करीत आहेत.- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक