शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

युवक करताहेत श्रमदानातून जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:50 IST

घरातून डबा बांधून घ्यायचा, पालकांनी खर्चासाठी दिलेल्या पॉकेटमनीतून वर्गणी गोळा करायची व मिळेल त्या वाहनाने नाशिकपासून ६० किलोमीटरवर असलेले उमरावणे हे आदिवासी गाव भल्या पहाटे गाठायचे व कोणाच्या आदेश, सूचनांची वाट न पाहता कामाला सुरुवात करायची. शनिवार व रविवार या हक्काच्या सुटीच्या दिवशी नाशिकच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समस्त महाविद्यालयीन युवकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पडेल अशाप्रकारचे कार्य उभे केले आहे.

नाशिक : घरातून डबा बांधून घ्यायचा, पालकांनी खर्चासाठी दिलेल्या पॉकेटमनीतून वर्गणी गोळा करायची व मिळेल त्या वाहनाने नाशिकपासून ६० किलोमीटरवर असलेले उमरावणे हे आदिवासी गाव भल्या पहाटे गाठायचे व कोणाच्या आदेश, सूचनांची वाट न पाहता कामाला सुरुवात करायची. शनिवार व रविवार या हक्काच्या सुटीच्या दिवशी नाशिकच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समस्त महाविद्यालयीन युवकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पडेल अशाप्रकारचे कार्य उभे केले आहे.  पावसाचे घटत चाललेले प्रमाण व दर उन्हाळ्यात ग्रामीण भागात भेडसाविणाऱ्या पिण्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनपातळीवर आजवर अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु तरीही समस्या आजही आ वासून उभी असल्यामुळे शासनाच्या उपाययोजनांचे पितळ उघडे पडू लागल्याने जलसेवेच्या या कामात स्वयंसेवी संस्थांनाच उतरावे लागले आहे. नाशिकच्या महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येत सिनेअभिनेते आमिर खान यांच्या ‘पानी फाउंडेशन’च्या कार्यापासून प्रेरणा घेत ‘जलसमृद्धी अभियान’ ही स्वयंसेवी संस्था उभी केली. नाशिक शहरातील गुरूगोविंदसिंग, संदीप फाउंडेशन, आरवायके, बीवायके, के. के. वाघ, केटीएचएम, व्ही. एन. नाईक या महाविद्यालयात अकरावी, बारावी तसेच डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वत:ला ‘जलसेवे’शी बांधून घेतले. त्यासाठी त्यांनी जलसंधारण विभागाकडून अतितीव्र पाणीटंचाई भासत असलेल्या गावांची माहिती गोळा केली. त्यावेळी नाशिक-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसारा घाटाला लागून असलेल्या उमरावणे या पाड्याची निवड केली. चढ-उताराची जमीन, काही ठिकाणी खडकाळ भाग व पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही पाणी अडविण्याची कोणतीही सोय नसलेल्या उमरावणे पाड्यात पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास या महाविद्यालयीन युवकांनी सुरू केला. त्यासाठी त्यांना शहापूरच्या जलसंधारण विभागाने तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन केले.  २०० ते २५० उंबरे असलेल्या या लहानशा पाड्यात राहणाºया आदिवासी ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्यामुळे त्यांच्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची निकड ओळखून ‘जलसमृद्धी अभियाना’तील युवकांनी महाविद्यालयाला सुट्या लागल्यानंतरच १० मेपासून ‘श्रमदानातून’ दर शनिवारी, रविवारी ‘जलसेवा’ हाती घेतली. उमरावणे गावात जावून गाठायचे, गावातील आदिवासींना अगोदर यात सुरुवातीला फक्त तरुणाईचा जोष, जल्लोष व नव्याची नवलाई वाटली, त्यामुळे त्यांनी अगोदर काहीसे नाराजीच्या भावनेतून तरुणांच्या कार्याकडे दुर्लक्ष केले. परंतु दर आठवड्याला सलग दोन दिवस शेकडो महाविद्यालयीन तरुण जीन्सची पॅन्ट, महागड्या टी शर्टचा विचार न करता, हातात कुदळ-पावडे घेऊन मातीत माखून घेत असल्याचे पाहून स्थानिक आदिवासींनी स्वत:हून या कार्यात सहभाग नोंदविला.  पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत तरुणांची ‘जलसेवा’ सुरू राहणार असून, श्रमदानातून आतापावेतो मातीनाला बांध, दगडी बांध, नाला खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परिसरातून दगड-धोंडे गोळा करून उत्कृष्ट  दगडी बांध बांधण्यात आला आहे. आता या युवकांना प्रतीक्षा  आहे, पहिल्या पावसाची व त्या पावसामुळे दुथडी भरून वाहणाºया नाल्याची !साथी हाथ बढाना !‘साथी हाथ बढाना’अशी साद घालत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सार्थक देवरे, प्रमोद पिटकर, माधुरी देवरे, बाळ कुलकर्णी, मुकुंद पानसे, मेधा पानसे, हर्शिता सूर्यवंशी, स्वप्नील सूर्यवंशी, सौरभ सूर्यवंशी, मोहित देवरे, केतकी पानसे, तुषार कोतकर, सोनाली कोतकर, अस्मिता कोतकर, गोरख चव्हाण, विशाल चव्हाण, ललित प्रसाद, किसन देवरे, मालती देवरे, संजय सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी, प्रियंका मांडके, प्रियंका सूर्यवंशी, रामेश्वर ढापसे आदीं युवक-युवतींनी या श्रमदानातून ‘जलसेवा’ साधली आहे.

टॅग्स :Waterपाणी