शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

युवक करताहेत श्रमदानातून जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:50 IST

घरातून डबा बांधून घ्यायचा, पालकांनी खर्चासाठी दिलेल्या पॉकेटमनीतून वर्गणी गोळा करायची व मिळेल त्या वाहनाने नाशिकपासून ६० किलोमीटरवर असलेले उमरावणे हे आदिवासी गाव भल्या पहाटे गाठायचे व कोणाच्या आदेश, सूचनांची वाट न पाहता कामाला सुरुवात करायची. शनिवार व रविवार या हक्काच्या सुटीच्या दिवशी नाशिकच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समस्त महाविद्यालयीन युवकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पडेल अशाप्रकारचे कार्य उभे केले आहे.

नाशिक : घरातून डबा बांधून घ्यायचा, पालकांनी खर्चासाठी दिलेल्या पॉकेटमनीतून वर्गणी गोळा करायची व मिळेल त्या वाहनाने नाशिकपासून ६० किलोमीटरवर असलेले उमरावणे हे आदिवासी गाव भल्या पहाटे गाठायचे व कोणाच्या आदेश, सूचनांची वाट न पाहता कामाला सुरुवात करायची. शनिवार व रविवार या हक्काच्या सुटीच्या दिवशी नाशिकच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समस्त महाविद्यालयीन युवकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पडेल अशाप्रकारचे कार्य उभे केले आहे.  पावसाचे घटत चाललेले प्रमाण व दर उन्हाळ्यात ग्रामीण भागात भेडसाविणाऱ्या पिण्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनपातळीवर आजवर अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु तरीही समस्या आजही आ वासून उभी असल्यामुळे शासनाच्या उपाययोजनांचे पितळ उघडे पडू लागल्याने जलसेवेच्या या कामात स्वयंसेवी संस्थांनाच उतरावे लागले आहे. नाशिकच्या महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येत सिनेअभिनेते आमिर खान यांच्या ‘पानी फाउंडेशन’च्या कार्यापासून प्रेरणा घेत ‘जलसमृद्धी अभियान’ ही स्वयंसेवी संस्था उभी केली. नाशिक शहरातील गुरूगोविंदसिंग, संदीप फाउंडेशन, आरवायके, बीवायके, के. के. वाघ, केटीएचएम, व्ही. एन. नाईक या महाविद्यालयात अकरावी, बारावी तसेच डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वत:ला ‘जलसेवे’शी बांधून घेतले. त्यासाठी त्यांनी जलसंधारण विभागाकडून अतितीव्र पाणीटंचाई भासत असलेल्या गावांची माहिती गोळा केली. त्यावेळी नाशिक-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसारा घाटाला लागून असलेल्या उमरावणे या पाड्याची निवड केली. चढ-उताराची जमीन, काही ठिकाणी खडकाळ भाग व पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही पाणी अडविण्याची कोणतीही सोय नसलेल्या उमरावणे पाड्यात पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास या महाविद्यालयीन युवकांनी सुरू केला. त्यासाठी त्यांना शहापूरच्या जलसंधारण विभागाने तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन केले.  २०० ते २५० उंबरे असलेल्या या लहानशा पाड्यात राहणाºया आदिवासी ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्यामुळे त्यांच्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची निकड ओळखून ‘जलसमृद्धी अभियाना’तील युवकांनी महाविद्यालयाला सुट्या लागल्यानंतरच १० मेपासून ‘श्रमदानातून’ दर शनिवारी, रविवारी ‘जलसेवा’ हाती घेतली. उमरावणे गावात जावून गाठायचे, गावातील आदिवासींना अगोदर यात सुरुवातीला फक्त तरुणाईचा जोष, जल्लोष व नव्याची नवलाई वाटली, त्यामुळे त्यांनी अगोदर काहीसे नाराजीच्या भावनेतून तरुणांच्या कार्याकडे दुर्लक्ष केले. परंतु दर आठवड्याला सलग दोन दिवस शेकडो महाविद्यालयीन तरुण जीन्सची पॅन्ट, महागड्या टी शर्टचा विचार न करता, हातात कुदळ-पावडे घेऊन मातीत माखून घेत असल्याचे पाहून स्थानिक आदिवासींनी स्वत:हून या कार्यात सहभाग नोंदविला.  पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत तरुणांची ‘जलसेवा’ सुरू राहणार असून, श्रमदानातून आतापावेतो मातीनाला बांध, दगडी बांध, नाला खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परिसरातून दगड-धोंडे गोळा करून उत्कृष्ट  दगडी बांध बांधण्यात आला आहे. आता या युवकांना प्रतीक्षा  आहे, पहिल्या पावसाची व त्या पावसामुळे दुथडी भरून वाहणाºया नाल्याची !साथी हाथ बढाना !‘साथी हाथ बढाना’अशी साद घालत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सार्थक देवरे, प्रमोद पिटकर, माधुरी देवरे, बाळ कुलकर्णी, मुकुंद पानसे, मेधा पानसे, हर्शिता सूर्यवंशी, स्वप्नील सूर्यवंशी, सौरभ सूर्यवंशी, मोहित देवरे, केतकी पानसे, तुषार कोतकर, सोनाली कोतकर, अस्मिता कोतकर, गोरख चव्हाण, विशाल चव्हाण, ललित प्रसाद, किसन देवरे, मालती देवरे, संजय सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी, प्रियंका मांडके, प्रियंका सूर्यवंशी, रामेश्वर ढापसे आदीं युवक-युवतींनी या श्रमदानातून ‘जलसेवा’ साधली आहे.

टॅग्स :Waterपाणी