शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

कोरोनाचे संकट दारात आलेय हे विसरता येऊ नये

By किरण अग्रवाल | Updated: April 12, 2020 00:37 IST

स्वत:ला झळ बसल्याखेरीज मनुष्याचे सामाजिक भान जागे होत नाही असे म्हणतात, ते खरेही आहे. याच न्यायाने विचार करता कोरोनाने नाशिक जिल्ह्यात पहिला बळी घेतल्यानंतर व गेल्या आठवड्यात वेगाने वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा पाहता संकटाने घरात शिरकाव केल्याचे व धोक्याची घंटा वाजून गेल्याचे स्पष्ट व्हावे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील संशयितांची व बाधितांची झपाट्याने वाढती संख्या चिंंता वाढविणारी डिस्टन्सिंगची सावधानता गरजेची

सारांश मुंबई-पुणे-नगर, जळगाव या लगतच्या जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नाशिक जिल्हा बचावला असल्याचे प्रारंभी समजले जात होते; परंतु अवघ्या दोन-तीन दिवसात एकाच शहरातील म्हणजे मालेगावमधील अकरा जण कोरोनाबाधित असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर आल्याने व त्यातील दोघांचा मृत्यूही झाल्याने कोरोनाच्या विषाणूने जिल्ह्याच्या दारावरील बेल वाजवून दिली आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ वर पोहोचली आहे, यात नाशिक, मालेगावसह निफाड व चांदवड या ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने जिल्हा यंत्रणेची धावपळ उडणे व ती धास्तावून जाणे स्वाभाविक ठरले आहे; पण जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या यंत्रणेसोबतच नागरिक म्हणून स्वत: आपण आपली काही काळजी घेणार आहोत की नाही व आपल्या वर्तन - व्यवहारात काही बदल करणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा कसा फज्जा उडविला गेला हे सर्वांच्या समोर आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने याबाबत परिश्रमपूर्वक प्रयत्न चालविलेले दिसत आहेत. ही यंत्रणा स्वत:च्या जिवावर उदार होत नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे; परंतु नागरिक मात्र घरात स्वस्थ बसायला तयार नाहीत. बंदोबस्तावरील पोलिस जरासे नजरेआड झाले की लगेच घरातली माणसे पाय मोकळे करायला बाहेर पडताना दिसत आहेत. ग्रामीण भागात तर बाजार करताना अक्षरशा गर्दी उडत आहे, यात सोशल डिस्टन्सिंगचा कुठेच मागमूस दिसत नाही. अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर पडू नका, असे यंत्रणा जीव तोडून सांगत आहेत. सामाजिक संस्थादेखील याबाबत जनजागृती करीत आहेत, तरी काही महाभाग ऐकायला तयार नाहीत. नागरिकांची ही बेपर्वाईच कोरोनाला निमंत्रण देण्यास पुरेशी ठरू पाहात आहे, हे दुर्दैवी आहे.नाशिक शहरातील बाधितांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहता ते बाहेरून प्रवास करून आल्याचे आढळून आले आहे. अशा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून प्रशासनाला माहिती देणे व होम क्वॉरण्टाइन करून स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित असताना तसे न केले गेल्याने त्यांची बाधित अवस्था पुढे आलेली आहे. म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालतानाच या व्यक्तींनी आपल्या आसपास राहाणाºया आप्तांच्या व शेजारपाजाऱ्यांच्याही जिवावर टांगती तलवार लटकवून दिल्याचे म्हणता यावे. मालेगावमधील परिस्थिती तर खरेच चिंंताजनक म्हणायला हवी. लागोपाठ दोन दिवसांमध्ये तेथे दोन अंकी संख्येत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला तेथे सक्तीने लॉकडाउनचे पालन करावयास लावणे गरजेचे बनले आहे. थोडक्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने संकट कसे वाढून ठेवले आहे हे लक्षात यावे. मात्र अशा आरोग्याशी संबंधित संकटाच्या समयी जनता सक्तीने घरी बसण्याऐवजी त्याबाबत स्वयंस्फूर्तता का दाखवत नाही, हा खरेच चिंंतेचा मुद्दा आहे.मुंबई-पुण्यातील परिस्थिती कशी बिकट होत चालली आहे हे आपण रोज बघतो आहोत. तेव्हा तसे आपल्या जिल्ह्याचे होऊ द्यायचे नसेल तर आपण घरात बसणे गरजेचे आहे, कारण आपण घरात बसलो तरच कोरोना बाहेर राहील. आपण बाहेर पडलो तर तो आत येऊ शकेल. तेव्हा अशी संधी देता कामा नये. नागरी कर्तव्य व जबाबदारीचा भाग म्हणून आपण याकडे बघायला हवे. हे संकट साधेसुधे किंंवा औटघटकेचे नाही. ते मोठे व या पुढील काळात परिणाम करणारे आहे, त्यामुळे त्याला रोखण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, सामाजिक भान त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.या संकट काळात हातावर पोट असलेल्या मजुरांची मोठी दैना झाली आहे. त्यांच्यासाठी अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती मदतीचा हात पुढे करीत सरसावल्या आहेत; परंतु असाही एक वर्ग आहे जो या मदतीचा लाभ उपटताना दिसत आहे. ही माणुसकीशून्यताच आहे; परंतु दुर्दैवाने असेही प्रकार अनुभवास येत आहेत. तेव्हा संबंधितांनीही जी काही मदत करायची असेल ती प्रशासनाच्या मार्फत करणे अधिक योग्य राहील. त्याबाबतही भान बाळगले जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात शासन-प्रशासन आपल्यापरीने कोरोनाशी झुंजत व लढत आहेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’, असे कालच म्हटले आहे. तेव्हा या पुढील काळात अधिक काळजीने व सावधगिरीने नागरिकांनी आपली भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे, तरच कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव रोखणे व स्वत:ला वाचवणे शक्य होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकHealthआरोग्य