शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे संकट दारात आलेय हे विसरता येऊ नये

By किरण अग्रवाल | Updated: April 12, 2020 00:37 IST

स्वत:ला झळ बसल्याखेरीज मनुष्याचे सामाजिक भान जागे होत नाही असे म्हणतात, ते खरेही आहे. याच न्यायाने विचार करता कोरोनाने नाशिक जिल्ह्यात पहिला बळी घेतल्यानंतर व गेल्या आठवड्यात वेगाने वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा पाहता संकटाने घरात शिरकाव केल्याचे व धोक्याची घंटा वाजून गेल्याचे स्पष्ट व्हावे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील संशयितांची व बाधितांची झपाट्याने वाढती संख्या चिंंता वाढविणारी डिस्टन्सिंगची सावधानता गरजेची

सारांश मुंबई-पुणे-नगर, जळगाव या लगतच्या जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नाशिक जिल्हा बचावला असल्याचे प्रारंभी समजले जात होते; परंतु अवघ्या दोन-तीन दिवसात एकाच शहरातील म्हणजे मालेगावमधील अकरा जण कोरोनाबाधित असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर आल्याने व त्यातील दोघांचा मृत्यूही झाल्याने कोरोनाच्या विषाणूने जिल्ह्याच्या दारावरील बेल वाजवून दिली आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ वर पोहोचली आहे, यात नाशिक, मालेगावसह निफाड व चांदवड या ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने जिल्हा यंत्रणेची धावपळ उडणे व ती धास्तावून जाणे स्वाभाविक ठरले आहे; पण जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या यंत्रणेसोबतच नागरिक म्हणून स्वत: आपण आपली काही काळजी घेणार आहोत की नाही व आपल्या वर्तन - व्यवहारात काही बदल करणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा कसा फज्जा उडविला गेला हे सर्वांच्या समोर आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने याबाबत परिश्रमपूर्वक प्रयत्न चालविलेले दिसत आहेत. ही यंत्रणा स्वत:च्या जिवावर उदार होत नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे; परंतु नागरिक मात्र घरात स्वस्थ बसायला तयार नाहीत. बंदोबस्तावरील पोलिस जरासे नजरेआड झाले की लगेच घरातली माणसे पाय मोकळे करायला बाहेर पडताना दिसत आहेत. ग्रामीण भागात तर बाजार करताना अक्षरशा गर्दी उडत आहे, यात सोशल डिस्टन्सिंगचा कुठेच मागमूस दिसत नाही. अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर पडू नका, असे यंत्रणा जीव तोडून सांगत आहेत. सामाजिक संस्थादेखील याबाबत जनजागृती करीत आहेत, तरी काही महाभाग ऐकायला तयार नाहीत. नागरिकांची ही बेपर्वाईच कोरोनाला निमंत्रण देण्यास पुरेशी ठरू पाहात आहे, हे दुर्दैवी आहे.नाशिक शहरातील बाधितांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहता ते बाहेरून प्रवास करून आल्याचे आढळून आले आहे. अशा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून प्रशासनाला माहिती देणे व होम क्वॉरण्टाइन करून स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित असताना तसे न केले गेल्याने त्यांची बाधित अवस्था पुढे आलेली आहे. म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालतानाच या व्यक्तींनी आपल्या आसपास राहाणाºया आप्तांच्या व शेजारपाजाऱ्यांच्याही जिवावर टांगती तलवार लटकवून दिल्याचे म्हणता यावे. मालेगावमधील परिस्थिती तर खरेच चिंंताजनक म्हणायला हवी. लागोपाठ दोन दिवसांमध्ये तेथे दोन अंकी संख्येत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला तेथे सक्तीने लॉकडाउनचे पालन करावयास लावणे गरजेचे बनले आहे. थोडक्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने संकट कसे वाढून ठेवले आहे हे लक्षात यावे. मात्र अशा आरोग्याशी संबंधित संकटाच्या समयी जनता सक्तीने घरी बसण्याऐवजी त्याबाबत स्वयंस्फूर्तता का दाखवत नाही, हा खरेच चिंंतेचा मुद्दा आहे.मुंबई-पुण्यातील परिस्थिती कशी बिकट होत चालली आहे हे आपण रोज बघतो आहोत. तेव्हा तसे आपल्या जिल्ह्याचे होऊ द्यायचे नसेल तर आपण घरात बसणे गरजेचे आहे, कारण आपण घरात बसलो तरच कोरोना बाहेर राहील. आपण बाहेर पडलो तर तो आत येऊ शकेल. तेव्हा अशी संधी देता कामा नये. नागरी कर्तव्य व जबाबदारीचा भाग म्हणून आपण याकडे बघायला हवे. हे संकट साधेसुधे किंंवा औटघटकेचे नाही. ते मोठे व या पुढील काळात परिणाम करणारे आहे, त्यामुळे त्याला रोखण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, सामाजिक भान त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.या संकट काळात हातावर पोट असलेल्या मजुरांची मोठी दैना झाली आहे. त्यांच्यासाठी अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती मदतीचा हात पुढे करीत सरसावल्या आहेत; परंतु असाही एक वर्ग आहे जो या मदतीचा लाभ उपटताना दिसत आहे. ही माणुसकीशून्यताच आहे; परंतु दुर्दैवाने असेही प्रकार अनुभवास येत आहेत. तेव्हा संबंधितांनीही जी काही मदत करायची असेल ती प्रशासनाच्या मार्फत करणे अधिक योग्य राहील. त्याबाबतही भान बाळगले जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात शासन-प्रशासन आपल्यापरीने कोरोनाशी झुंजत व लढत आहेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’, असे कालच म्हटले आहे. तेव्हा या पुढील काळात अधिक काळजीने व सावधगिरीने नागरिकांनी आपली भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे, तरच कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव रोखणे व स्वत:ला वाचवणे शक्य होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकHealthआरोग्य