शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"4 राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:34 IST

मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला ...

मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यापुढे यश मिळणार नाही. प्रियंका गांधी यांची जादू उत्तर प्रदेशात चालली नाही. त्यामुळे काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. पण, या पक्षात सक्रिय असा नेताच उरलेला नसल्याने हा पक्षच दिसेनासा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला यापुढे भवितव्य राहिलेले नाही, असे परखड मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनमाड येथे धावत्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी आठवले यांचे रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, गंगाधर त्रिभुवन, दिनकर धिवर, सचिन दराडे, रूपेश आहिरे, नीलेश इंगळे यांनी स्वागत केले. रिपब्लिकन पार्टीचे व आंबेडकरी चळवळीचे मनमाड शहर व परिसरात अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुढील निवडणुकांतही ते टिकवून ठेवावे तसेच कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही आठवले यांनी केले. शिवसेना-भाजपाने यापुढे तरी एकत्र यायला हवे. सत्तावाटपाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरवायला हवे. संजय राऊत किंवा शिवसेनेचे इतर खासदार मला भेटले की मी त्यांना याबाबतीत कायम सूचना व विचारविनिमय करीत असतो, असेही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीShiv Senaशिवसेना