शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणेही शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:33 IST

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यात दहावीच्या निकालानंतर एखाद्या विद्यार्थ्याने अकरावीसाठी प्रवेश अर्ज केला असताना त्याला डिप्लोमा व इतर विद्याशाखांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाल्यास पालकांच्या लेखी अर्जाद्वारे अकरावीसाठी केलेला प्रवेश अर्ज त्याला मागे घेऊन अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणेही शक्य होणार आहे.

नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यात दहावीच्या निकालानंतर एखाद्या विद्यार्थ्याने अकरावीसाठी प्रवेश अर्ज केला असताना त्याला डिप्लोमा व इतर विद्याशाखांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाल्यास पालकांच्या लेखी अर्जाद्वारे अकरावीसाठी केलेला प्रवेश अर्ज त्याला मागे घेऊन अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणेही शक्य होणार आहे.त्याचप्रमाणे एका फेरीत एकाच शाखेचा किमान एक ते जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येईल. एकाच फेरीत विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या शाखांचे पसंतीक्रम भरता येणार नसल्याने गुणवत्ता यादीत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.गुणवत्ताधारक विद्यार्थी डिप्लोमा आणि अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतही सहभागी होतात. परंतु, डिप्लोमासाठी चांगले महाविद्यालय मिळाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी केलेला अर्ज तसाच प्रलंबित राहिल्याने गुणवत्ता यादीत असे विद्यार्थी कायम राहत असल्याने मागील विद्यार्थ्यांची अनेकदा चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी चुकते. असे प्रकार कमी करण्यासाठी यावर्षीपासून शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अन्य विद्या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेल्याने इतर विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांत प्रवेशाची संधी मिळू शक णार आहे. यासोबतच अकरावी प्रवेशप्रक्रियेत शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशातील आरक्षण तक्त्यातही बदल झाला आहे. यात इनहाउस कोटा २० टक्क्यांहून १० टक्के करण्यात आला आहे, तर व्यवस्थापन कोटा ५ आहे. शहरातील ११ अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांत अल्पसंख्याकांसाठी ५० टक्के कोटा आहे. द्विलाक्षी तथा बायोफोकल अभ्यासक्रमासाठी २५ टक्के कोटा असूनही कोट्यांतर्गत प्रवेश पूर्ण केल्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रिया होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाचे बदलकोणत्याही स्तरावर लिखित अर्जाद्वारे प्रवेश अर्ज मागे घेण्याची सुविधा.महाविद्यालयांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करता येणार नाही.एका फेरीत एक प्रवेश अर्जाद्वारे एकच शाखेची मागणी करता येईल.किमान एक व कमाल दहा महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार.दुसºया फेरीपासून पसंतीक्रम बदलताना ते कितीही देता येतील.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी