शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पाण्याने मराठवाड्याचा प्रश्न सुटला

By श्याम बागुल | Updated: August 22, 2018 17:58 IST

नगर व मराठवाड्यातील गावांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेष करून गंगापूर व दारणा आणि पालखेड धरणातून दरवर्षी

ठळक मुद्देजायकवाडीला १९ टीएमसी पाणी : ३५ टक्के धरण भरले२० जुलैपासून गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात

नाशिक : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून गेल्या महिनाभरात १९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहोचून ३५ टक्के जलसाठा झाला आहे.नगर व मराठवाड्यातील गावांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेष करून गंगापूर व दारणा आणि पालखेड धरणातून दरवर्षी नगर व मराठवाड्यासाठी पाणी सोडले जाते. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून तीन वर्षांपूर्वी मोठे रणकंदन माजले होते. राज्य सरकारने नाशिकवर दबाव टाकून १२ टीएमसी पाणी गंगापूर धरणातून पळविल्याने या विषयावरून राजकारणही रंगले होते. त्यानंतर सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने जायकवाडीत पाणी सोडण्याची वेळ आली नाही. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात सरासरी १३० टक्के पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच गंगापूर धरणात ८० टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे गोदावरीला दोन वेळा आलेल्या पुरामुळे जायकवाडीत पुरेसे पाणी पोहोचले होते. यंदाही जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यात जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी व दारणा धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला. साधारणत: २० जुलैपासून गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या गंगापूर, दारणा ही दोन्ही धरणे ९० टक्क्यांच्या पुढे भरली असून, पालखेड धरणातूनही पाणी सोडले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही धरणांच्या क्षेत्रात अजूनही पाऊस कायम असल्यामुळे धरणाची सुरक्षितता लक्षात घेता सोमवारपासून गंगापूर व दारणा धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. दारणा व गोदावरीचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाºयात पोहोचून तेथून ते पुढे नगरमार्गे जायकवाडीत जात आहे. जायकवाडी धरणाची क्षमता १०० टीमसी पाणी साठवण्याची असून, आजवर नाशिक जिल्ह्यातून धरणात १९ टीमसी पाणी पोहोचले आहे, त्याच्या आधारे जायकवाडीत सध्या ३५ टक्के साठा झाला आहे.

टॅग्स :DamधरणNashikनाशिक