नाशिक : महाराष्टÑातील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षापासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या लागत असल्याने कारखान्याच्या या सा-या परिस्थितीस जबाबदार असलेल्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय साखर सहसंचालकांनी घेतला असून, तसे आदेश त्यांनी विशेष लेखा परिक्षकास दिले आहेत.या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्असून, दिड हजार कारखाना कर्मचाºयांची उपासमार होत आहेत तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे उत्पादन बंद झाले आहे. ३५ हजार सभासदांचे करोडे रूपयांचे भाग भांडवल बुडीत झाले आहे. कारखान्यावर ३०० कोटी रूपयांचा बोझा झालेला आहे. या सर्व गोष्ष्टींचा परिणाम म्हणून कारखाना परिसरातील ५४ शेतक-यांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. या सा-या बाबींना त्या त्या वेळचे कारखान्याचे संचालक व अधिकारी जबाबदार आहेत. निफाड कारखान्याची ऊस क्षेत्राची उपलब्धता विचारात घेता निसाकाया गाळप क्षमता प्रतिदिन १२०० टनावरून ४००० टन करणे उपयुक्त व व्यवहार्य होते काय? याची चौकशी करावी, गाळप क्षमता वाढविण्यासाठी मशिनरी व सामग्री खरेदी नियमानुसार झाली काय? गाळप क्षमता वाढविल्यामुळे पुरेसा ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखाना दररोज चार तास नो केन होत होता त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्यांची चौकशी व्हावी, निसाका इतकी गाळप क्षमता असलेल्या खासगी कारखान्यात ४०० कर्मचारी काम करतात तर निसाकात १५०० कामगारांचीआवश्यकता होती काय? निसाकाने सन २००८ ते २०१२ या कालावधीत ८५० ते ९०० प्रति क्विंटल दराने साखरेची विक्री केली त्याच वेळी साखरेचा दर २७०० ते ३००० प्रति क्विंटल इतका झाला होता त्यामुळे कारखान्याला १०० कोटीचा फटका बसला या साखर घोटाळ्याची चौकशी करावी, सन २००३ ते २००६ या कालावधीत चेकने साखर विक्री करण्यात आली, त्यातील अनेक चेक न वटताच परत आले व कारखान्याचे नुकसान झाले त्यास जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी.
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची लेखा परिक्षकाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:16 IST
ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्असून,
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची लेखा परिक्षकाकडून चौकशी
ठळक मुद्देऊस उत्पादकांची तक्रार : शासनाकडून तातडीने दखलभ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षापासून कारखाना बंद