शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन महिन्यात वाटर मीटर बसवा; जलसंपदा मंत्र्यांचे महापालिकेला आदेश

By suyog.joshi | Updated: February 15, 2025 15:04 IST

बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.

नाशिक (सुयोग जोशी) : शहरात असमतोल पाणी वाटप होत आहे. मलनिसारण केंद्रातून नदीपात्रात ६५ टक्के पाणी प्रक्रिया करून सोडणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ते होत नसल्याचा ठपका ठेवत सध्या पाणी गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. सर्व भागात सारखे पाणीवाटप होणे गरजेचे असून त्यासाठी येत्या तीन महिन्यात शहराच्या प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवून शासनाला अहवाल सादर करावा असे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दिले. बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विखे म्हणाले, - पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वच महापालिका, नगर पालिकेसाठी आढावा बैठक घेण्याचे काम सुरू आहे. बिगर सिंचनाचे आरक्षण वाढत चालले आहे. नाशिक महापालिकेची यंत्रणा जुनाट झाली आहे. त्याचीही माहिती घेतली जात आहे. नाशिकचे पाणी मराठवाड्याला पळविले जात असल्याबद्दल विखे म्हणाले, याबाबत माझ्यापर्यंत कोणतीही चर्चा नाही.उलट दिलेले पाणी मनपाने वापरावे. त्यातील ६५ टक्के पाणी नदीत आम्हाला द्यावे. मंजूर पाण्याची कपात केली जाणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यासाठी गोदावरी स्वच्छ हवी

आगामी कुंभमेळ्याच्या पाश्व'भूमीवर गोदावरी स्वच्छ ठेवणे, प्रदुषणमुक्त करणे गरजेचे आहे. त्यात प्रत्येकाचाच सहभाग महत्वाचा आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाकडे जास्तीत जास्त निधी मागावा, त्याच निधीतून पाण्यासाठी अधिक निधी कसा वापरता येईल याचे नियोजन पाटबंधारे खाते व महापालिकेने एकत्रितरित्या करावे असे आवाहनही विखे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील