शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:54 PM

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.

ठळक मुद्देवटार : ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात; आर्थिक नियोजन कोलमडले

ओतूरला कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी करताना शेतकरी.वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. हे पीक तीन ते चार महिन्यात येत असल्याने नगदी पीक म्हणून याकडे शेतकरी पाहतात. चालूवर्षी सुरुवातीपासून चांगला बाजारभाव असल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि बदलते हवामान पिच्छा सोडण्यास तयार नाही, परिणामी महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा आहे.कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकली जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती; पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेंडा वाळणे असेअनेक रोग येत असून, महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.पाच-सहा वर्षांपासून वरु णराजा रुसला होता. परिणामी परिसरात पाण्याचे मोठे संकट होते; पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहू, हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, वातावारणाचा फटका गव्हालाही बसत असून, विविध रोगाने गव्हाला ग्रासले आहे तर हरभरा पिकाला ऐन गाठे भरण्याच्या वेळेस अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होणार आहे. यावर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसा उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता; पण व्याजाने व उसनावर पैसे घेऊन रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली खरी; पण बदलत्या हवामानामुळे शेतकº्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.महागड्या औषधांची फवारणीमहागडी औषधांची कांद्यावर फवारणी करीत आहे. या रोगराईमुळे यावर्षी कांद्याचं उत्पादन घटणार आहे. दरवर्षी ओतूर परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीस व रोगराई अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा उशिराने कांदा लागवड होत आहे. त्यातच ओतूर धरणाच्या पाणी गळतीमुळे फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी पडते. परिणामास विहिरींचे पाणी तळ गाठते चालूवर्षी चांगला पाऊसझाल्याने मार्च महिन्यापर्यंत थंडी राहील व पाणीही टिकेल, अशी आशा वाटते. मजूर टंचाईला यंदा सामोरे जावे लागले. बºयाच शेतकऱ्यांनी बाहेरगावांहून मजूर आणून लागवड ठेका पद्धतीने केली आहे. कांद्याला चांगले दर असल्याने महागडी रोपे आणूनही यंदा कांदा लागवडीत दरवर्षापेक्षा घट झाली आहे.ओतूर परिसरातील शेतकरी हैराण४ओतूर : परिसरात ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊन कांदा पिकावर करपा व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हैराण झाला आहे. यावर्षी दोन -तीन वेळा उन्हाळ कांद्याची रोपे टाकूनही अवकाळी पावसामुळे ती खराब होऊन वाया गेली. त्यामुळे थोडीफार जगवलेलीरोपे व इतर ठिकाणांहून विकत आणलेली महागडी रोपे घेत कशीबशी लागवड केली; परंतु गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सकाळी पडणारे धुके व दवबिंदू यामुळे करपा व भुरी रोगाने थैमान घातले आहे.माझा दोन एकर कांदा लागवड करून दोन महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भात होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत जर बघितली तर शेती हासुद्धा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील का नाही याचा भरोसा नाही.- हरिष खैरनार, कांदा उत्पादक वटार

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा