शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:52 PM

तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त असलेले दिसतात.

ठळक मुद्देपूर्व भागात ढगाळ हवामान : उत्पादन खर्चात वाढ; भाजीपाल्याची लागवड सुरू

एकलहरे : तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त असलेले दिसतात.एकलहरे परिसरारातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढे या परिसरातील शेतकरी अजूनही कांदे लागवड करताना दिसतात. अनेक ठिकाणी कांदेलागवड होऊन महिना दोन महिने झाले आहेत, अशा ठिकाणी शेतकरी पिकांना खते देणे, पाणी देणे, निंदणी करणे, द्राक्षांची खुडणी करणे आदी कामात व्यस्त आहेत. काही ठिकाणी भाजीपाल्याची लागवड सुरू असलेली दिसते. टमाटे, कोथिंबीर लागवड करून साधारण तीन आठवडे झाल्याने युरिया खत देऊन पाणी भरणे सुरू आहे. काही ठिकाणी पूर्ण वाढ झालेली कोथिंबीर उपटून, जुड्या बांधून मार्केटला नेतात. सध्या सुमारे ७०० रु पये शेकडा कोथिंबीर व्यापारी खरेदी करतात.काही ठिकाणी भेंडी, वाल, घेवडा या वेलवर्गीय पालेभाज्या काढून मार्केटला पाठविल्या जातात. त्याबरोबरच कोबी, फ्लॉवर या भाज्याही काढून बाजारात नेल्या जातात, मात्र सध्या वाटाणा, गाजर व इतर पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोबी, फ्लॉवरच्या भावात घट झाली आहे. व्यापारी २ ते ३ रु पये कोबी, ४ ते ५ रु पये फ्लॉवर नगाप्रमाणे खरेदी करतात. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही, अशीतक्रार शेतकरी करतात. सध्या वातावरणातील बदल व ढगाळ हवामानामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, थ्रीप्स या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते.गव्हाचे क्षेत्र जोमात, हरभरा जेमतेमतालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके म्हणजे गहू व हरभरा ही आहेत. यंदा अतिपावसामुळे शेतात उशिरापर्यंत ओलावा टिकून होता. त्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाची पेरणी उशिरा झाली आहे. आगाऊ पेरलेला गहू आता ओंब्यांवर आला आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी गव्हावर औषधे फवारणी सुरू आहे. हरभरा कमी प्रमाणात लागवड केलेला दिसतो. काही ठिकाणी हरभऱ्याला घाटे लागवड झालेली दिसते. पूर्व भागात पिकांना पाणी देण्यासाठी शेततळी, विहिरी खोदून पाण्याचा साठा केलेला दिसतो. दारण व गोदावरी नद्यांमध्ये हा भाग येत असल्याने शेतकऱ्यांनी नदीवरून थेट पाइपलाइन टाकून पाणी आणले आहे. हे पाणी शेततळ्यात अथवा विहिरीत साठवून ठेवले जाते व योग्यवेळी पिकांना दिले जाते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रenvironmentपर्यावरण