शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल : दंडकारण्य नव्हे; ओसाड नाशिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 18:01 IST

दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देघनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र नष्ट ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्यची गरजसाडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले

नाशिक : रामायणकाळात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकची ओळख काळानुरूप नष्ट झाली असून हे भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. नाशिकचे १५ हजार ५३० चौरस किलोमीटर इतके भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी केवळ साडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले आहेत. उर्वरित ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड झाले आहे. घनदाट जंगलाचे प्रमाण मात्र शुन्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून आता नाशिककरांनी खºया अर्थाने ‘देवराई’ विकसीत करण्याचा विडा उचलणे गरजेचे आहे.दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी वनमहोत्सवांतर्गत जरी वन मंत्रालयाकडून कोटीच्या कोटी वृक्षलागवडीचे उड्डाण केले जात असले तरी प्रत्यक्षात नाशिकचे जंगलाचे क्षेत्र विरळच आहे. वृक्षारोपणाचा शासकीय आकडा मांडला जातो मात्र रोपांचे संवर्धन करत वृक्षांमध्ये रुपांतर झाल्याचा आकडा शासकिय स्तरावरुन पुढे येत नाही ही शोकांतिका आहे.घनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र संपुर्णत: नष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात नाशिककरांना अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण अनुभवयास येईल का, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. निसर्गप्रेमी नाशिककरांनी ख-या अर्थाने वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्य करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील वनसंपदा नष्ट होत असून वनविभागालाही ती वाढविणे अशक्य होत आहे. वनविभागाला जोपर्यंत लोकसहभागाची जोड मिळणार नाही, तोपर्यंत जिल्ह्याचे वनसंवर्धन होणे अशक्य असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. झाडे लावणे, ती जगविणे आणि सांभाळणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी आहे, असा गैरसमज नाशिककरांना काढून टाकावा लागणार आहे. कारण २०१५नंतर भारतीय वन सर्वेक्षण या राष्ट्रीय संस्थेकडून प्रसिध्द झालेल्या अहवालामधून राज्यासह नाशिकची वनस्थिती चिंताजनक असल्याचे समोर येते.

देवराई-वनराई’ उपक्रम करणार मातशहरात आपलं पर्यावरण संस्थेने तीन ते चार वर्षांपुर्वी देवराई व वनराई निर्मितीसाठी पुढाकार घेत वनविभागाच्या ओसाड वनक्षेत्रावर लोकसहभागातून वृक्षारोपण करुन संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. सातपूर येथे देवराई व म्हसरुळ येथील वनराईमध्ये अनुक्रमे अकरा हजार व साडे पाच हजार रोपांचे संगोपन मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. रोपट्यांचे वृक्षांमध्ये रुपांतर होऊ लागले आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :forestजंगलNashikनाशिकenvironmentवातावरण