शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल : दंडकारण्य नव्हे; ओसाड नाशिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 18:01 IST

दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देघनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र नष्ट ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्यची गरजसाडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले

नाशिक : रामायणकाळात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकची ओळख काळानुरूप नष्ट झाली असून हे भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. नाशिकचे १५ हजार ५३० चौरस किलोमीटर इतके भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी केवळ साडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले आहेत. उर्वरित ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड झाले आहे. घनदाट जंगलाचे प्रमाण मात्र शुन्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून आता नाशिककरांनी खºया अर्थाने ‘देवराई’ विकसीत करण्याचा विडा उचलणे गरजेचे आहे.दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी वनमहोत्सवांतर्गत जरी वन मंत्रालयाकडून कोटीच्या कोटी वृक्षलागवडीचे उड्डाण केले जात असले तरी प्रत्यक्षात नाशिकचे जंगलाचे क्षेत्र विरळच आहे. वृक्षारोपणाचा शासकीय आकडा मांडला जातो मात्र रोपांचे संवर्धन करत वृक्षांमध्ये रुपांतर झाल्याचा आकडा शासकिय स्तरावरुन पुढे येत नाही ही शोकांतिका आहे.घनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र संपुर्णत: नष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात नाशिककरांना अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण अनुभवयास येईल का, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. निसर्गप्रेमी नाशिककरांनी ख-या अर्थाने वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्य करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील वनसंपदा नष्ट होत असून वनविभागालाही ती वाढविणे अशक्य होत आहे. वनविभागाला जोपर्यंत लोकसहभागाची जोड मिळणार नाही, तोपर्यंत जिल्ह्याचे वनसंवर्धन होणे अशक्य असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. झाडे लावणे, ती जगविणे आणि सांभाळणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी आहे, असा गैरसमज नाशिककरांना काढून टाकावा लागणार आहे. कारण २०१५नंतर भारतीय वन सर्वेक्षण या राष्ट्रीय संस्थेकडून प्रसिध्द झालेल्या अहवालामधून राज्यासह नाशिकची वनस्थिती चिंताजनक असल्याचे समोर येते.

देवराई-वनराई’ उपक्रम करणार मातशहरात आपलं पर्यावरण संस्थेने तीन ते चार वर्षांपुर्वी देवराई व वनराई निर्मितीसाठी पुढाकार घेत वनविभागाच्या ओसाड वनक्षेत्रावर लोकसहभागातून वृक्षारोपण करुन संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. सातपूर येथे देवराई व म्हसरुळ येथील वनराईमध्ये अनुक्रमे अकरा हजार व साडे पाच हजार रोपांचे संगोपन मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. रोपट्यांचे वृक्षांमध्ये रुपांतर होऊ लागले आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :forestजंगलNashikनाशिकenvironmentवातावरण