शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल : दंडकारण्य नव्हे; ओसाड नाशिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 18:01 IST

दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देघनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र नष्ट ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्यची गरजसाडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले

नाशिक : रामायणकाळात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकची ओळख काळानुरूप नष्ट झाली असून हे भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. नाशिकचे १५ हजार ५३० चौरस किलोमीटर इतके भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी केवळ साडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले आहेत. उर्वरित ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड झाले आहे. घनदाट जंगलाचे प्रमाण मात्र शुन्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून आता नाशिककरांनी खºया अर्थाने ‘देवराई’ विकसीत करण्याचा विडा उचलणे गरजेचे आहे.दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी वनमहोत्सवांतर्गत जरी वन मंत्रालयाकडून कोटीच्या कोटी वृक्षलागवडीचे उड्डाण केले जात असले तरी प्रत्यक्षात नाशिकचे जंगलाचे क्षेत्र विरळच आहे. वृक्षारोपणाचा शासकीय आकडा मांडला जातो मात्र रोपांचे संवर्धन करत वृक्षांमध्ये रुपांतर झाल्याचा आकडा शासकिय स्तरावरुन पुढे येत नाही ही शोकांतिका आहे.घनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र संपुर्णत: नष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात नाशिककरांना अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण अनुभवयास येईल का, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. निसर्गप्रेमी नाशिककरांनी ख-या अर्थाने वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्य करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील वनसंपदा नष्ट होत असून वनविभागालाही ती वाढविणे अशक्य होत आहे. वनविभागाला जोपर्यंत लोकसहभागाची जोड मिळणार नाही, तोपर्यंत जिल्ह्याचे वनसंवर्धन होणे अशक्य असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. झाडे लावणे, ती जगविणे आणि सांभाळणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी आहे, असा गैरसमज नाशिककरांना काढून टाकावा लागणार आहे. कारण २०१५नंतर भारतीय वन सर्वेक्षण या राष्ट्रीय संस्थेकडून प्रसिध्द झालेल्या अहवालामधून राज्यासह नाशिकची वनस्थिती चिंताजनक असल्याचे समोर येते.

देवराई-वनराई’ उपक्रम करणार मातशहरात आपलं पर्यावरण संस्थेने तीन ते चार वर्षांपुर्वी देवराई व वनराई निर्मितीसाठी पुढाकार घेत वनविभागाच्या ओसाड वनक्षेत्रावर लोकसहभागातून वृक्षारोपण करुन संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. सातपूर येथे देवराई व म्हसरुळ येथील वनराईमध्ये अनुक्रमे अकरा हजार व साडे पाच हजार रोपांचे संगोपन मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. रोपट्यांचे वृक्षांमध्ये रुपांतर होऊ लागले आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :forestजंगलNashikनाशिकenvironmentवातावरण