शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

चीनविरोधात नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे अन्य देशांचे भारताकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 09:05 IST

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या ...

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या देशांनाही भारताबाबत आश्वासकता वाटत असून, ते देश भारताच्या बाजूने सक्षमपणे उभे राहत असल्याचे प्रतिपादन संरक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा.शि. मुंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संरक्षणविषयकतज्ज्ञ नितीन गोखले यांनी गुंफले. जीओपॉलिटिक्स इन २०३०-इंडो पॅसिफिक हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे अध्यक्षस्थानी होते. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजित सिंग आनंद हे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून मालेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, सहकार्यवाह नितीन गर्गे यांच्यासह इतर मान्यंवर उपस्थित होते.

इंडो पॅसिफिकमध्ये भारत इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी होण्यासाठी आपल्याला सैनिकीकरण, आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वीस वर्षांत भारताचे महत्त्व वाढले असून, अमेरिका भारताला वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे, सर्व मदत भारताला देण्यास ते तत्पर असून चीनविरुद्ध आमच्या बाजूने राहा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर ‘लूक इस्ट’ऐवजी ‘ॲक्ट इस्ट’ पॉलिसी अमलात आणली असून, त्यात फायदा होऊ लागला आहे. हा बदल झाला असून, यूएईमध्ये भारताला जेवढे स्थान, मान आहे तेवढा अमेरिकेलासुद्धा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संस्थेचे नाशिक विभाग खजिनदार शीतल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. आरती शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले.

भारताचा आत्मविश्वास बळावला

चीनविरोधात जेव्हा उभे राहायची वेळ येते, तेव्हा भारत त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून सक्षमपणे उभे राहू शकतो. चीनला परतवून लावल्याने भारतीय सैन्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१६ उरी आणि २०१९ बालाकोटमधील हल्ल्यांना ज्या पद्धतीने तोडीस तोड उत्तर दिल्याने भारताचे स्थान उंचावले आहे. चीनने स्वतःला सक्षम बनविले असून, अमेरिकेसह इतर देशही त्यांच्या जवळपासही सध्या दिसत नाही. चीनने इतर छोट्या देशांना कर्जबाजारी करून अनेक छोट्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ताब्यात घेतले आहे. स्वाभाविकच कर्जपरतफेड न करता आल्याने त्यांची गोची झाली आहे. या सर्व देशांना आपलेसे करणे किंवा त्यांची सहानुभूती मदत मिळविण्यासाठी आपल्याकडे ओढणे हे भारतापुढील मोठे आव्हान असेल. पाकिस्तानला मदत करण्यास चीन नेहमी तत्पर असून, भारताविरोधात चीन व पाकिस्तान मिळून सतत कारवाया करीतच राहणार असल्याने सदैव दक्षता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान