शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

चीनविरोधात नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे अन्य देशांचे भारताकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 09:05 IST

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या ...

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या देशांनाही भारताबाबत आश्वासकता वाटत असून, ते देश भारताच्या बाजूने सक्षमपणे उभे राहत असल्याचे प्रतिपादन संरक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा.शि. मुंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संरक्षणविषयकतज्ज्ञ नितीन गोखले यांनी गुंफले. जीओपॉलिटिक्स इन २०३०-इंडो पॅसिफिक हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे अध्यक्षस्थानी होते. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजित सिंग आनंद हे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून मालेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, सहकार्यवाह नितीन गर्गे यांच्यासह इतर मान्यंवर उपस्थित होते.

इंडो पॅसिफिकमध्ये भारत इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी होण्यासाठी आपल्याला सैनिकीकरण, आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वीस वर्षांत भारताचे महत्त्व वाढले असून, अमेरिका भारताला वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे, सर्व मदत भारताला देण्यास ते तत्पर असून चीनविरुद्ध आमच्या बाजूने राहा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर ‘लूक इस्ट’ऐवजी ‘ॲक्ट इस्ट’ पॉलिसी अमलात आणली असून, त्यात फायदा होऊ लागला आहे. हा बदल झाला असून, यूएईमध्ये भारताला जेवढे स्थान, मान आहे तेवढा अमेरिकेलासुद्धा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संस्थेचे नाशिक विभाग खजिनदार शीतल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. आरती शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले.

भारताचा आत्मविश्वास बळावला

चीनविरोधात जेव्हा उभे राहायची वेळ येते, तेव्हा भारत त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून सक्षमपणे उभे राहू शकतो. चीनला परतवून लावल्याने भारतीय सैन्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१६ उरी आणि २०१९ बालाकोटमधील हल्ल्यांना ज्या पद्धतीने तोडीस तोड उत्तर दिल्याने भारताचे स्थान उंचावले आहे. चीनने स्वतःला सक्षम बनविले असून, अमेरिकेसह इतर देशही त्यांच्या जवळपासही सध्या दिसत नाही. चीनने इतर छोट्या देशांना कर्जबाजारी करून अनेक छोट्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ताब्यात घेतले आहे. स्वाभाविकच कर्जपरतफेड न करता आल्याने त्यांची गोची झाली आहे. या सर्व देशांना आपलेसे करणे किंवा त्यांची सहानुभूती मदत मिळविण्यासाठी आपल्याकडे ओढणे हे भारतापुढील मोठे आव्हान असेल. पाकिस्तानला मदत करण्यास चीन नेहमी तत्पर असून, भारताविरोधात चीन व पाकिस्तान मिळून सतत कारवाया करीतच राहणार असल्याने सदैव दक्षता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान