शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

चीनविरोधात नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे अन्य देशांचे भारताकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 09:05 IST

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या ...

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या देशांनाही भारताबाबत आश्वासकता वाटत असून, ते देश भारताच्या बाजूने सक्षमपणे उभे राहत असल्याचे प्रतिपादन संरक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा.शि. मुंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संरक्षणविषयकतज्ज्ञ नितीन गोखले यांनी गुंफले. जीओपॉलिटिक्स इन २०३०-इंडो पॅसिफिक हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे अध्यक्षस्थानी होते. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजित सिंग आनंद हे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून मालेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, सहकार्यवाह नितीन गर्गे यांच्यासह इतर मान्यंवर उपस्थित होते.

इंडो पॅसिफिकमध्ये भारत इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी होण्यासाठी आपल्याला सैनिकीकरण, आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वीस वर्षांत भारताचे महत्त्व वाढले असून, अमेरिका भारताला वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे, सर्व मदत भारताला देण्यास ते तत्पर असून चीनविरुद्ध आमच्या बाजूने राहा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर ‘लूक इस्ट’ऐवजी ‘ॲक्ट इस्ट’ पॉलिसी अमलात आणली असून, त्यात फायदा होऊ लागला आहे. हा बदल झाला असून, यूएईमध्ये भारताला जेवढे स्थान, मान आहे तेवढा अमेरिकेलासुद्धा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संस्थेचे नाशिक विभाग खजिनदार शीतल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. आरती शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले.

भारताचा आत्मविश्वास बळावला

चीनविरोधात जेव्हा उभे राहायची वेळ येते, तेव्हा भारत त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून सक्षमपणे उभे राहू शकतो. चीनला परतवून लावल्याने भारतीय सैन्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१६ उरी आणि २०१९ बालाकोटमधील हल्ल्यांना ज्या पद्धतीने तोडीस तोड उत्तर दिल्याने भारताचे स्थान उंचावले आहे. चीनने स्वतःला सक्षम बनविले असून, अमेरिकेसह इतर देशही त्यांच्या जवळपासही सध्या दिसत नाही. चीनने इतर छोट्या देशांना कर्जबाजारी करून अनेक छोट्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ताब्यात घेतले आहे. स्वाभाविकच कर्जपरतफेड न करता आल्याने त्यांची गोची झाली आहे. या सर्व देशांना आपलेसे करणे किंवा त्यांची सहानुभूती मदत मिळविण्यासाठी आपल्याकडे ओढणे हे भारतापुढील मोठे आव्हान असेल. पाकिस्तानला मदत करण्यास चीन नेहमी तत्पर असून, भारताविरोधात चीन व पाकिस्तान मिळून सतत कारवाया करीतच राहणार असल्याने सदैव दक्षता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान