शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

चीनविरोधात नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे अन्य देशांचे भारताकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 09:05 IST

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या ...

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या देशांनाही भारताबाबत आश्वासकता वाटत असून, ते देश भारताच्या बाजूने सक्षमपणे उभे राहत असल्याचे प्रतिपादन संरक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा.शि. मुंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संरक्षणविषयकतज्ज्ञ नितीन गोखले यांनी गुंफले. जीओपॉलिटिक्स इन २०३०-इंडो पॅसिफिक हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे अध्यक्षस्थानी होते. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजित सिंग आनंद हे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून मालेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, सहकार्यवाह नितीन गर्गे यांच्यासह इतर मान्यंवर उपस्थित होते.

इंडो पॅसिफिकमध्ये भारत इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी होण्यासाठी आपल्याला सैनिकीकरण, आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वीस वर्षांत भारताचे महत्त्व वाढले असून, अमेरिका भारताला वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे, सर्व मदत भारताला देण्यास ते तत्पर असून चीनविरुद्ध आमच्या बाजूने राहा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर ‘लूक इस्ट’ऐवजी ‘ॲक्ट इस्ट’ पॉलिसी अमलात आणली असून, त्यात फायदा होऊ लागला आहे. हा बदल झाला असून, यूएईमध्ये भारताला जेवढे स्थान, मान आहे तेवढा अमेरिकेलासुद्धा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संस्थेचे नाशिक विभाग खजिनदार शीतल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. आरती शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले.

भारताचा आत्मविश्वास बळावला

चीनविरोधात जेव्हा उभे राहायची वेळ येते, तेव्हा भारत त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून सक्षमपणे उभे राहू शकतो. चीनला परतवून लावल्याने भारतीय सैन्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१६ उरी आणि २०१९ बालाकोटमधील हल्ल्यांना ज्या पद्धतीने तोडीस तोड उत्तर दिल्याने भारताचे स्थान उंचावले आहे. चीनने स्वतःला सक्षम बनविले असून, अमेरिकेसह इतर देशही त्यांच्या जवळपासही सध्या दिसत नाही. चीनने इतर छोट्या देशांना कर्जबाजारी करून अनेक छोट्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ताब्यात घेतले आहे. स्वाभाविकच कर्जपरतफेड न करता आल्याने त्यांची गोची झाली आहे. या सर्व देशांना आपलेसे करणे किंवा त्यांची सहानुभूती मदत मिळविण्यासाठी आपल्याकडे ओढणे हे भारतापुढील मोठे आव्हान असेल. पाकिस्तानला मदत करण्यास चीन नेहमी तत्पर असून, भारताविरोधात चीन व पाकिस्तान मिळून सतत कारवाया करीतच राहणार असल्याने सदैव दक्षता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान