शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिन शासकिय सोहळा : तीस हजार कुटुंबांना मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:25 IST

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते  तिरंगा फडकविण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकरी सन्मान योजनेतून १ लाख ४९ हजार शेतक-यांना ७९३ कोटी २९ लाखांचा लाभ दोन वर्षात ४४७ गावे जलसमृध्द झाल्याचा दावाही महाजन यांनी केला.

नाशिक : पंडीत जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथमस्थानी असून ग्रामिण भागातही विविध घरकूल योजनांच्याद्वारे २१ हजार कुटुंबांना घरकूल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आगामी काळात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ३० हजार गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केलेनाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते  तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अकादमीच्या संचालक अस्वती दोरजे, पोलीस अधिक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण शिवार, उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदि माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. मागील दोन वर्षात ४४७ गावे जलसमृध्द झाल्याचा दावाही महाजन यांनी यावेळी केला. शेतकरी सन्मान योजनेतून १ लाख ४९ हजार शेतक-यांना ७९३ कोटी २९ लाखांचा लाभ दिला गेल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी मराठा समाजासाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचाही आढावा घेत, मेरी येथे विद्यार्थी वसतीगृहासाठी दोन इमारतींच्या हस्तांतरणाला मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान, मुलींचा जन्मदर वाढीसाठी आरोग्य विभागाकडून कौतुकास्पद प्रयत्न झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वन मंत्रालयाकडून राबविलेल्या वनमहोत्सवांतर्गत राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीचे अभियान वनविभाग व सर्व शासकिय, निमशासकिय सरकारी यंत्रणांसह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात सरकारला यश आल्याचे महाजन म्हणाले.दरम्यान, याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजन