शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

युतीच्या इच्छुकांची वाढली घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:51 AM

विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन नामांकन दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही भाजप-सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा व त्याचबरोबर जागावाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन नामांकन दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही भाजप-सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा व त्याचबरोबर जागावाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. जागा वाटपानंतरही ज्या मतदारसंघांमध्ये फेरबदलाची शक्यता आहे अशा मतदारसंघातील इच्छुकांना तर युती झाल्यास बरे, नाही झाले तर आणखी बरे असे वाटू लागले आहे.लोकसभा निवडणूक एकत्रित लढलेल्या भाजप-सेनेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय तणाव निर्माण झाला होता. परंतु अखेरच्या क्षणी युतीची घोषणा करून भाजप मोठा भाऊ, तर सेना लहान भाऊ म्हणून एकमेकांच्या साथीने निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपला सेनेपेक्षाही अधिक यश मिळाल्याने प्रत्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात सेनेच्या वाट्याला एकच मंत्रिपद मिळाल्याने सेनेत नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थिती विधानसभा निवडणुकीत युती होते किंवा नाही अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून झडत असून, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मात्र युती होणारच असा दावा करीत असताना दुसरीकडे मात्र एकमेकांना अटी, शर्ती घालत आहेत. त्यामुळे अधून मधून युतीत ठिणग्या उडू लागल्या आहेत. सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून राज्यातील जनतेकडे ‘मला आशीर्वाद देणार का’ असा सवाल करून आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिलेले तर जागोजागी त्यांच्या नावे ‘महाराष्टÑाचे भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्सही लावले गेले आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीची घोषणा होवूनही युतीची घोषणा व जागावाटप होत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर अनेकांना संधी मिळू शकते मात्र युती झाली तर अनेकांना आहे तेथेच थांबावे लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात २००९च्या जागावाटपात सेना मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरल्याने जागावाटपात त्यांना दहा जागा, तर भाजप लहान असल्यामुळे त्यांना पाचच जागा देण्यात आल्या. गेल्या निवडणुकीत मात्र युती नसल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले चालू निवडणुकीत नेमके कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे अद्याप स्पष्ट होत नाही. भाजपने जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील सुमारे १७५ इच्छुकांच्या मुलाखती यापूर्वीच घेतल्या असून, सेनेनेही सर्वच मतदारसंघाचा आढावा घेऊन राजकीय गणिते तपासून पाहिली आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी युती न झाल्यास लढण्याची तयारी केली असली तरी, अजूनही युती होईलच अशी दोन्ही पक्षांच्या इच्छुकांना वाटत आहे. विद्यमान परिस्थितीत पक्षाच्या आमदाराचे मतदारसंघ त्या पक्षाला सुटण्याची शक्यता असली तरी, नाशिक पश्चिम, नांदगाव, कळवण या तीन मतदारसंघाबाबत दोन्ही पक्षांकडून आग्रह आहे.अर्ज भरण्यास अवघे पाच दिवसनिवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करून निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. २७ सप्टेंबरपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. म्हणजेच पाचच दिवस शिल्लक असून, अशा परिस्थितीत युती व जागांची घोेषणा झाल्यास इच्छुकांना नामांकनासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास कमी अवधी मिळणार आहे. परंतु हातावर हात ठेवण्यापलीकडे कोणताही पर्याय शिल्लक दिसत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा