शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामीण भागात वाढली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:08 IST

वडनेर : सध्या मालेगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरातील कोरोना रु ग्णाची संख्या ३२४ पर्यंत पोहोचली आहे. याचा परिणाम तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवून आला आहे.

ठळक मुद्देकोरोना : शेतकामे वगळता सर्वच व्यवसाय ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : सध्या मालेगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरातील कोरोना रु ग्णाची संख्या ३२४ पर्यंत पोहोचली आहे. याचा परिणाम तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवून आला आहे.शेतकामे वगळता कुणीही बाहेर निघत नाही, तर बाहेरगावातील नागरिकांना प्रत्येक गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वडनेरसारख्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात पूर्णपणे लॉकडाउन नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्धारित वेळेत किराणा व दवाखाने मेडिकल सुरू असतात तर बाकी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.शासनाच्या नियमांचे प्रामुख्याने ग्रामीण भागात काटेकोर पालन केले जात आहे. सकाळी मजूर शेतात फिजिकल डिस्टन्सिंग पाळत शेतशिवारातील कामे करत आहेत. मालेगाव शहरात कोरोना सर्वच भागात पाय पसरवत आहे. यामुळे ग्रामीण भागात येऊ नये याकरिता गावातून कोणी मालेगाव जाते का व मालेगावहून गावात येते का? याकडे गावकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत असून, गावात प्रत्येकाची घरे बंद दिसून येत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी शेतात राहण्याची सोय आहे,असे शेतकरी शेतात राहण्यास गेले आहेत.अनेक गावांच्या सीमा बंदसध्या शहरात सर्वच भागात कोरोना आपले पाय पसरवत आहे. कॅम्प, सोयगाव, हिंमतनगर भागातही रु ग्ण मिळून आल्याने याचा मोठा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. या भागात नोकरी व इतर कामानिमित्त शहरात राहत असलेली अनेक कुटुंबे वाढत्या रु ग्णसंख्येची धास्ती घेत गावखेड्यातील आपल्या घराकडे राहण्यास निघाले आहेत.अशा कुटुंबाकडे गावकºयांचे लक्ष आहे. एकीकडे शहरात लोक भाजीपाला घेण्यासाठी बाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. याउलट ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारे भाजीपाला घेण्यासाठी नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. नागरिक भाजीपाला व इतर कामानिमित्त बाहेर निघत नाहीत. अनेक गावांच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. गावात पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ अजंग, खाकुर्डी, पाटणे, दाभाडी आदी गावांमध्ये सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य