टंचाई असलेल्या गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ टॅँकरची संख्याही नऊने वाढली
By Admin | Updated: April 18, 2015 00:45 IST2015-04-18T00:44:53+5:302015-04-18T00:45:22+5:30
टंचाई असलेल्या गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ टॅँकरची संख्याही नऊने वाढली

टंचाई असलेल्या गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ टॅँकरची संख्याही नऊने वाढली
नाशिक : जिल्'ात अवकाळी पावसाचा मारा सुरूच असला तरी कडक उन्हाची काहिलीही वाढू लागली असून, टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात असलेल्या टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या २१ वरून ३० झाली आहे. एप्रिल सुरू होताच जिल्'ातील पाणीटंचाई असलेल्या गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवडाअखेर ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. काल (दि.१७) अखेर जिल्'ात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई कृती आराखड्यांतर्गत जिल्'ातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्'ातील टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात टॅँकरची संख्या- बागलाण- ४ गाव (२), चांदवड- २ (१), दिंडोरी- ० (०), देवळा- २ गावे- ५ वाड्या एकूण ७ (३), इगतपुरी- ० (०), मालेगाव- ० (०), नांदगाव- ८ गावे- ३९ वाड्या एकूण- ४७ (५), नाशिक- ० (०), निफाड- ० (०), पेठ- ० (०), सुरगाणा- ११ गावे- ५ वाड्या एकूण १६ (३), सिन्नर- ६ गावे- ५८ वाड्या एकूण-६४ (११), त्र्यंबकेश्वर- ० (०), येवला- १९ गावे- ५ वाड्या एकूण- २४ (५) अशा एकूण ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)